टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”
तब्बल ११ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी चषकावर आपले नाव कोरले. आता त्याच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला तब्बल ११ वर्षांनंतर आयसीसी चषकावर आपले नाव कोरण्यात यश आले. २९ जून रोजी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवून भारतीय संघ विश्वविजेता ठरला. त्यानंतर आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माबाबत मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्माने विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र यापुढे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी तोच कर्णधार असेल, असे जय शाह यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे जाहीर केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि तिसऱ्या आयसीसी कसोटी विश्वचषकासाठी रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






