विजयानंतर चाहत्यांनी गिलला ठरवले व्हिलन

भारताने १० विकेट्स राखून मोठा विजय साकारला, विजयानंतर चाहत्यांनी गिलला व्हिलन ठरवले आहे.

Jul 14, 2024 - 07:17
 0  55
विजयानंतर चाहत्यांनी गिलला ठरवले व्हिलन
gill

हरारे : भारताने दणदणीत १० विकेट्स राखून जिंकला. पण या भारताच्या विजयानंतर आता शुभमन गिलला व्हिलन ठरवले जात आहे. गिलकडून मोठी चूक घडली आणि त्यामुळे चाहते त्याच्यावर चांगलेच रागावले आहेत. त्यामुळेच गिलला आता चाहत्यांनी व्हिलन ठरवले आहे.
झिम्बाब्वेने भारतापुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने या आव्हानाच एकही विकेट न गमावता यशस्वीपणे पाठलाग केला. यशस्वी जैस्वालने यावेळी नाबाद ९३ धावांची खेळी साकारली, तर शुभमन गिलने नाबाद ५८ धावांची खेळी साकारली. या दोघांची चांगलीच जोडी यावेळी जमली होती. पण तरीही चाहत्यांनी गिलला आता व्हिलन बनवलं आहे आणि यशस्वीबरोबर त्याने नेमकं काय केलं तेदेखील सांगितलं आहे.

यशस्वी आणि गिल यांनी शतकी सलामी दिली. त्यावेळी यशस्वीने अर्धशतक झळकावले होते. पण गिलचे अर्धशतक मात्र झाले नव्हते. यशस्वी यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत होता. त्यामुळे यशस्वी हा सामना लवकर संपवणार, असे दिसत होते. भारताला विजयासाठी जेव्हा २३ धावांची गरज होती, तेव्हा यशस्वी हा ८३ धावांवर खेळत होता आणि त्याला शतक पूर्ण करायला १७ धावांची गरज होती. त्यामुळे आता यशस्वीचे शतक होणार, असेच सर्वांना वाटत होते. पण त्यावेळी गिलने त्याचा घात केला. कारण गिलने यशस्वीला त्यानंतर जास्त फलंदाजी करण्याची संधीच दिली नाही. भारताने हा विजय १५.२ षटकांतच मिळवला. त्यामुळे भारताकडे चेंडूही जास्त होते, त्यामुळे घाई करण्याची कोणतीच गरज नव्हती. पण गिलने स्वत:कडे जास्त स्ट्राइक ठेवली आणि त्याने आपले अर्धशतक झाल्यावरही फटकेबाजी केली. त्यामुळे यशस्वीचे शतक हुकले आणि चाहते गिलवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चाहते आता गिलला Selfish असं म्हणत आहेत.
यशस्वीने यावेळी अशी धमाकेदार फटकेबाजी केली की, सर्व जण त्याच्या फलंदाजीवर फिदा झाले होते. यशस्वी आता शतक झळकावणार, असे सर्वांनाच वाटत होते. पण गिलने मात्र यशस्वीचे शतक होऊ दिले नाही, अशी भावना चाहत्यांच्या मनात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow