पाणीपुरवठा़ ! उजनी शंभर टक्के भरूनही पाण्याची बोंब

काँग्रेसचे मनीष गडदे यांची तक्रार

Aug 10, 2024 - 11:44
 0  64
पाणीपुरवठा़ !  उजनी शंभर टक्के भरूनही पाण्याची बोंब
पाणीपुरवठा़ ! उजनी शंभर टक्के भरूनही पाण्याची बोंब

सोलापूर : विजापूर रोडवरील सैफुल, नेहरूनगर , पापाराम नगर, आदित्यनगर या भागात 4चार दिवसाड एक रोटेशन पाणी सोडले व न्यूजपेपरला बातम्या दिल्या, आम्ही चौकशी केल्यावर सांगीतले गेले की, पाणी ४ दिवसाड यापुढे येईल.... परंतु आज ५ दिवस झाले पाणी आले नाही. हा अन्याय आहे. दिशाभूल आहे, तक्रार अड. मनीष गडदे यांनी केली आहे. उजनी शंभर टक्के भरून देखील सोलापुरात पाण्याची बोंब नेहमीच आहे. याबाबत प्रशासन नागरिकांच्या  संवेदनशीलतेचा अंत पाहात आहे.
हे रोटेशनचे निर्णय नेमकं कोण घेतयं? हे रोटेशन कमी जास्त करण्याचे अधिकार कुणाला आहेत याचा खुलासाचं होत नाही, याकडे लक्ष वेधून गडदे म्हणाले, चावीवाला , ज्यु. इंजीनियर, असि. इंजीनियर, डेप्युटी इंजीनियर, PHE या सर्व PDS supply chain मध्ये अजिबात समन्वय नाही. यातील प्रत्येक व्यक्ति जबाबदारी झटकत आहे. कृपया संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सविस्तर नियोजन करून कुठे 6,5दिवसाड, कुठे 4 दिवसाड हा अन्यायकारक असमतोल दूर करावा व सर्वत्र किमान चार ४दिवसाड  सुरळीत करावा, अशी मागणी अॅड. मनीश गडदे पाटील (सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी) यांनी केली आहे..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow