भीषण अपघात, भाविकांचा टेम्पो विहिरीत कोसळून १४ ठार

सोलापूर–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी (जि. सोलापूर) येथे भाविकांनी भरलेला टेम्पो विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील १४ भाविकांचा पाणी व गुदमरल्याने मृत्यू झाला. हे सर्व भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शन करून परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. घटनेनंतर स्थानिकांनी आणि बचाव पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत.

Jun 14, 2026 - 18:49
Jun 14, 2026 - 21:12
 0  962
भीषण  अपघात, भाविकांचा टेम्पो विहिरीत कोसळून १४ ठार

सोलापूर : पंढरपूर येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. सोलापूर–म्हसवड मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेला टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते परतीच्या प्रवासात असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट विहिरीत कोसळला. विहिरीत पाणी असल्याने आणि वाहन पूर्णपणे पलटी झाल्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

या अपघातात महिलां आणि लहान मुलांसह एकूण १४ भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व मृत रांजणी गावातील असल्याने गावावर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बचावकार्य सुरूच आहे. विहिरीत आणखी काही प्रवासी अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow