पुढारीच सर्वाधिक कर्जबुडवे? बँक़ा स्पष्टपणेच म्हणतात
बँक़ा कर्जवाटप करतात, त्यांचा अनुभव असा आहे की, कर्ज बुडवणारी सर्वात मोठी जात म्हणजे पुढारी. त्यामुळे कर्ज मंजुरीसाठी पुढार्याचा जामीन घेतला जात नाही, दारातही उभे करीत नाही

(विजयकुमार पिसे)
कारभारात उलथापालथ करणारी पुरुष मंडळी सत्तेचे शकट आपल्याच हाती असावी म्हणून नाना युक्त्या, प्रयुक्त्या आणि शह काटशह करतात.पण जेव्हा अर्थकारण सुरू होते, तिथे पुढार्यांची विश्वासार्हता संपते. राज्याचे जलमंत्री गुलाबराव पाटील यांची राजकीय कारकिर्द तशी वादग्रस्त. त्यांचे बोलणे भल्याभल्यांना झोंबते. बँक़ा महिलांना कर्ज द्यायला तयार असतात. पण गुलाबराव पाटील वा अन्य कुणी कर्ज मागितलं की एकही बँक तयार होत नाही. संभाजी नगरमध्ये राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाकडून फाईव्ह स्टार हॉटेल खरेदी असो एमआयडीसीमध्ये आरक्षित भूखंड घशात घालण्याचा प्रकार. शिरसाट सामान्य रिक्षाचालक. आमदार ते मंत्री झाल्यानंतर इतकी मोठी प्रॉपर्टी, माया कशी काय जमविली. त्यामुळे सामान्यांना प्रश्न पडतो. आणि बँक़ा देखील पुढार्यांना कर्जमंजुरीबाबत हात आखडता घेतात.
पुढार्यांप्रमाणेच पत्रक़ार, वकील व पोलीस अशा "पी" वर्गीय यांच्याही भेटी घेतल्या. त्यांचाही असाच अनुभव आहे. महिला कर्ज कमी रकमेचा घेतात. आणि निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळात कर्ज फेडतात. त्यांच्याबाबत बँक़ांचे धोरण उदार असते. पुरुषप्रधान संस्कृतीचा कर्जफेडण्याविषयी नन्नाचा पाढा. महिला वेळेवर कर्ज फेडतात, त्यांच्या हातात अर्थकारण गेलं तर निश्चितच चांगला अनुभव येतो. सुदैवाने देशाच्या अर्थकारणाची सूत्रे निर्मला सीतारमण या कर्तृत्वव़ान महिलेच्या हातात आहे. म्हणून देश जागतिक पातळीवर चौथा आर्थिक महासत्ता झाला आहे.
What's Your Reaction?






