महाराष्ट्राचा मणिपूर आणि शरद पवार!
राज ठाकरे : जातीयतेचे विष पेरणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा!!

जातीयतेचे विष पेरल्यामुळे पूर्वांचलात मणिपूर होरपळतोय, याकडे लक्ष वेधून मनसे प्रमुख राज ठाकरे शरद पवार यांच्यावर टीका केली. सोमवारी सोलापूर दौऱ्यात ठाकरे म्हणाले, शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांना केले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काल रविवारीच सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात राजकीय वातावरण कलुषित होत आहे याकडे लक्ष वेधले असता, तेव्हा राज ठाकरे म्हणाले, यात मीडियाचीही मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रात आरक्षणाची आवश्यकता नाही. मात्र जातीयतेचे विष करणाऱ्या नेत्यांचे भाषणे दाखवणे बंद करा. आपोआप यावर लगाम बसेल. सोशल मीडियावर जे व्हायरल व्हायचंय ते होऊ द्या. जातीचा विचार न करता महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. यातून चांगला रोजगार व नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत. पण आज स्थिती काय आहे. इतर राज्यातील मुलं महाराष्ट्रात येऊन शिक्षण घेतात व नोकऱ्या बळकवतात. हे कशामुळे झाले. खाजगी संस्था कोणाच्या हातात आहेत. पैसा द्या आणि डिगऱ्या घ्या. या संस्थांमध्ये आरक्षण आहे का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
दरम्यान राज ठाकरे यांनी, स्वबळावर निवडणुकीची घोषणा केली. तसेच शिवडी आणि पंढरपूर या मतदारसंघात बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे या दोन उमेदवारांची घोषणाही केली. शिवडी या मतदारसंघात शिवसेनेचे अजय चौधरी आणि पंढरपूर मतदार संघात भाजपाचे समाधान आवताडे हे दोन विद्यमान आमदार आहेत.
आज मतांसाठी राजकारण इतके घाणेरडे झाले आहे की आरोपांची पातळी खालावली आहे. त्यामुळे केवळ मतांसाठी जातीयतेचे विष पेरणाऱ्या राजकारण्यांना लोकांनीच धडा शिकवला पाहिजे. राजकारण्यांना या निवडणुकीतून हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले.
मनसे विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्याची चाचपणी करण्यासाठी हा दौरा आहे. त्यानुसार ठाकरे यांनी आजच मनसेचे दोन उमेदवारही जाहीर करून आघाडी घेतली.
What's Your Reaction?






