माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणेची जय्यत तयारी ..!
जिल्हाधिकारी व सिईओ यांचा संयुक्त पाहणी दौरा..!

सोलापूर : आषाढी यात्रा यशस्वी करणे साठी जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आज सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पालखी तळांची पाहणी करून वारकरी बांधवाच्या
सेवे साठी सज्ज राहणेचे सुचना दिल्या. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सजग रहा असे सांगत चांगले काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे पाठीवर शबासकीची थाप दिली. दरम्यान आज जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ मनिषा आव्हाळे यांनी हिरकणी कक्ष व वारकरी यांचे साठी उभा करणेत आलेल्या आरोग्य केंद्रास
संयुक्तीक भेटी देऊन पाहणी केली.
आज सकाळी ८ वाजता गोपाळपूर, वाखरी, भंडीशेगाव, पिराची कुरोली, वेळापूर, पुरंदावडे, धर्मपुरी, अकलूज (संग्रामनगर) सराटी फाटा यासह बोरगाव, माळीनगर व तोंडले येथील पालखी तळ मुक्कामाची स्थिती जाणून घेतली.
सध्या1)पालखी तळ water proof मंडप, तात्पुरते शौचालय स्थळ, स्नानगृह, पालखी, गोल/उभे रिंगण स्थळ, पालखी कट्टा सुशोभीकरण, पालखी मार्ग रस्ते, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, हिरकणी कक्ष
, पाणीपुरवठा विहीर व शुद्धीकरण, स्वागत कमान, रोषणाई, टॅकर पाणी भरणा केंद्र, तात्पुरते आरोग्य केंद्र, प्लास्टिक/ कचरा संकलन केंद्राची पाहणी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी विभाग प्रमुखासह केली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, प्रकल्प संचालक अमोल जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






