देशमुखी हिसका!
सोलापुरातील भाजपाच्या दोन देशमुखांच्या राजकारणाची केमिस्ट्री अफलातून. त्यांच्या समर्थक़ांना उभयतांमधील संघर्ष पाहण्यात मोठा आनंद. भले चाहे दुश्मन.... सलामत रहे दोस्ताना हमारा हे गीत त्यांच्याच समर्थकांनी मोठ्या आनंदाने व्हायरल केले आहे. आमदारद्वय सुभाषबापू आणि देशमुख मालक तसेच त्यांच्या समर्थक़ांना वाटणारा हा आनंद शत प्रतिशत सलामत रहो. समस्त कायकर्ते व मतदारांच्यावतीनेही शुभकामना...।

(विजयकुमार पिसे)
राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो हे सोलापूऱ बाजार समितीच्या निवडणुकीत दिसतच आहे. भाजपाच्या सोलापुरी देशमुखी हिस्सा नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हितशत्रूंनी अनुभवला असेलच. आ.सुभाषबापू आणि आ. विजयकुमार देशमुख यांची तिकीटं कापण्याची प्रतिज्ञा कैकजणांनी केली, सोबत चिमणीलाही घेतले होते. पण... कहा गये वो लोग. या दरम्यान एकीचा मंत्र जपण्याचा सल्ला त्यांनी तंतोतंत पाळला असावा. (पंपावर) काही हितशत्रू भेटले आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे का? अशी विचारणाही केली. पण आला ना अनुभव. ना तिकीट कापले गेले, पाडायचे प्रयत्न आटोकाट झाले. तेच झाले कडेलोट.
पडद्याआड असलेली एकी आता बाजार समिती निवडणुकीत एकदम पडद्यावर आली. याला म्हणतात देशमुखी हिसका. निवडणुकीचा निकाल काहीही लागो. पण देशमुखी हिसका म्हणजे ताक देखील फुंकून पिणार. दररोज कानगोष्टी करणारे कार्यकर्ते एकदम सर्द झालेत. सोशल मिडियावर कुणी म्हणतंय सलामत रहे दोस्ताना.. दोस्त दोस्त ना राहा... देशमुख पॅटर्न. मार्केट कमिटीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बापू आणि मालक यांची चाय पे डिप्लोमसी झाली. त्यानंतरही घडामोडी, भेटीगाठी आणि बैठकांचा सिलसिला संपला नाहीय. म्हेत्रे, काका साठे, महादेवअण्णा आणि सिध्दाराम चाकोते, बाळासाहेब शेऴके, देवकते परिवार, जाफरताज पाटील, जेउरचे मल्लीकार्जुन पाटील, शिंदे सेनेचे मनीष काळजे सगळी मंडळी पक्ष आणि मनभेद विसरून एक़ झालीयत. मार्केट कमिटीच्या गत निवडणुकीत दोन देशमुख इकडे तिकडे होते. भाजपाच्या तत्कालिन दोन अध्यक्षांनी मोठी ताकद लावली. तरीही देशमुख मालक सभापती झालेच. शेवटपर्यंत सभापतीपद सलामत राहिले. आडवा येण्याचा कुणी प्रयत्न केला, त्याचीच (मान) कापली गेली. अविश्वासाच्या वेळी तेव्हाही दोन देशमुख एकच होते. (रामप्पा होटगीकर आणि अप्पासाहेब वडकबाळकरांची रसद).
चार आमदार असूनही भाजपाला मिळणार फक्त दक्षिणा हे कुणीही खपवून घेणार नाही. भाजपाला नुसता मान आणि (विरोधकांना) पान. निवडणुकीत हार जीत होईल. पण या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे सेना यांनी बाजार समितीत चालणारी मनमानी खपवून न घेण्याचा निश्चय केला आहे. राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. त्यानंतर प्रचाराला रंगत आली आहे. त्यामुळे निकाल काही जरी लागला तरी सभापती (पदाचा कोन) कोण? एकहाती राहणार नाही. तिथेही कदाचित देशमुखी हिस्सा निर्णायक.
राहिला प्रश्न. देवाभाउंचा सांगावा. ती चर्चा ेनंतर कुणाच्याही कानावर आली नाही. मग नेमकं खरं काय? निवडणूक निकालानंतर हा सांगावा ठळकपणे समोर येईल. तूर्तास देशमुखी हिसका धीरे से लगे....असे म्हणताता कट्टर विरोधक़ असलेले काँग्रेसजण देखील देशमुखांच्या गळाला लागले आहेत. या काँग्रेसींनाही ठाउकाय.... आपलं भलं देशमुखांच्या हातूनच होईल. त्यामुळे हे ऐक्य अनेकांना सुखद ठरले, असेच मानता येईल.
What's Your Reaction?






