हिंदू अल्पसंख्य झाला तर जिहादी विचार वाढतो

महंत रामगिरी महाराज म्हणाले 100 टक्के मतदान हीच सुरक्षा, विहिंपतर्फे लोकजागर अभियान उपक्रम

Nov 15, 2024 - 09:46
 0  176
हिंदू अल्पसंख्य झाला तर जिहादी विचार वाढतो

सोलापूर : ज्या ठिक़ाणी हिंदू अल्पसंख्य होतो, तिथे जिहादी विचार वाढतो. शेजारच्या बांगला देशात आपण जे पाहातो, ती वेळ येथील हिंदुंवर आली नाही पाहिजे. त्यासाठी शंभर टक्के मतदान करा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील सरला बेट धामचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. विश्‍व हिंदू परिषदेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात 100 टक्के मतदान करण्यासाठी लोकजागर अभियान सुरू केले आहे. त्यावेळी होटगी रोड व रामवाडी, लियमेवाडी परिसरात महंत रामगिरी महाराज यांचे प्रबोधन प्रवचनाचे आयोजन केले होते. 

महंत रामगिरी महाराजांच्या प्रवचनप्रसंगी विहिंपचे जिल्हा अध्यक्ष हभप अभिमन्यू डोंगरे महाराज, जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, धर्मप्रसार प्रमुख जयदेव सुरवसे, हनुमान नगर प्रखंड अध्यक्ष नागेश इनामदार, संयोजक धनंजय कारंडे तसेच लिमयेवाडी येथील कार्यक्रमास हभप लक्ष्मण महाराज चव्हाण, हभप डोंगरे महाराज, हभप अच्युत मोफरे, हभप देविदास जगताप, हभप पुष्पलता भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी संतांचे वचन आणि शिवाजी महाराजांची नीती आणि महाभारतामधील धर्म-अधर्म याची उदाहरणे सांगितली. हिंदू धर्म सहिष्णू आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांनी परस्त्री मातेसमान म्हणून नेहमीच सन्मान केला. महाभारतात कौरवांनी कपटांनी द्रौपदीच्या पाच पुत्रांची हत्या केली. पण त्याचा बदला घेतला नाही. तेव्हा अश्‍वत्थामाच्या आईच्या भावनेचा विचार द्रौपदीने सांगितला. पण जेव्हा धर्मशास्त्र म्हणून युध्दात समोर आपले कोणी आप्त असले तरी त्यांचा विचार न कऱता शस्त्र चालवण्याचा उपदेश श्रीकृष्णाने केला. आता हिंदू धर्म आणि हिंदू समाजाचे हित मतदान करण्यात आहे. मतदानाचे हे शस्त्र चालवण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी जागरूक रहा, शत प्रतिशत मतदान करा, असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले. यावेळी ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण, हभप डोंगरे महाराज, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख जयदेव सुरवसे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रबोधन मंचाचे संयोजक आकाश शिरते, बजरंग दलाचे विष्मय भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow