महंत रामगिरी महाराज आणि पोलीस अधिक़ार्यांत शाब्दीक चकमक
विहिंपच्या शंभर टक्के मतदान लोकजागर अभियानप्रसंगी घडला प्रकार

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील सरला बेट धामचे महंत रामगिरी महाराज हे बुधवारी सोलापूर शहरात धार्मिक़ प्रवचन-व्याख्यानासाठी आले असता त्यांना नोटीस बजावण्यावरून महंत रामगिरी महाराज आणि पोलीस अधिकार्यात भाविकांसमोरच शाब्दीक चकमक झाली. रामगिरी महाराजांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांना मात्र नमते घ्यावे लागले. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 100 टक्के मतदान करण्यासाठी लोकजागर अभियान सुरू केले आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी हा प्रक़ार घडला.
*ऑगस्ट महिन्यात एका प्रवचनामध्ये महंत रामगिरी महाराज यांच्या त्या वक्तव्यावरून आज सोलापुरातही पोलिसांचा ससेमिरा सुरू होता. प्रवचनाआधीच नोटीस बजवायला हवी. तसे न होता. त्यांचे प्रवचन ऐकले. त्यात वादग्रस्त काही वक्तव्य झाले नाही. तरी देखील पोलिस अधिकारी प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आग्रही होते. पण हा सारा प्रकार देर आयेेे दुरुस्त..., की उशीरा सुचलेले.... की केवळ फाँर्म्यालिटी पार पाडणे हा पोलिस प्रशासनाचा खटाटोप होता?*
महंत रामगिरी महाराज शंभर टक्के मतदार पार पडले पाहिजे, कारण ही लोकशाही त्यावर उभी असून लोकशाहीत मतदान हेच मोठे शस्त्र आहे. त्याचा पुरेपूर वापर करून मतदान केले तर योग्य विचार करणारे सरकार येवू शकते, असे सांगितले. महाराजांच्या प्रवचनानंतर एमआयडीसी पोलिस आणि सदर बझारचे पोलिस धावतच आले. (त्यांना पोहोचण्यास उशीर झाला होता.) महाराजांचे भाषण संपताच पोलीस अधिकार्यांनी त्यांना नोटीस घेण्यास सांगितले. तेव्हा कशाची नोटीस, मला नोटीस कशाला. कार्यक्रम माझा नव्हता. मी पाहुणा म्हणून आलोय, त्यांनी मला बोलावलेय. असा सवाल केला. तरीही पोलीस अधिकारी नोटीस घेण्याचा आग्रह करीत होते. तेव्हा मात्र रामगिरी महाराजांनी पवित्रा बदलला. महाराजांनी वादग्रस्त भाषण करू नये, त्यावर प्रतिबंध करण्यासाठी ही नोटीस आहे. असे अधिकारी म्हणाले. आता काय नोटीस देता. भाषण झाल्यानंतर, माझा काय संबंंध. हा उलटफेर सुरू आहे. असा प्रतिसवाल केल्यानंतर पोलिस अधिक़ारी वरमला.
हा सारा प्रक़ार भक्त मंडळी आणि संयोजकांसमोरच सुरू होता. भाविकांनी देखील पोलीस खात्याच्या या भूमिकेबद्दल नाराज आणि संताप व्यक्त करीत होते. माघारलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना झाल्या प्रक़ारची माहिती देवून नोटीस महाराज घेत नसल्याचे सांगितले. अधिकार्यांच्या संभाषणानंतर संबंधित अधिकार्याला माघार घ्यावी लागली. त्यांचा नाईलाज झाला.
असाच प्रक़ार सदर बझार आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्याचाही झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणीच सदर बझारचे पोलिस अधिकारी दाखल झाले. आपला अर्ज आयत्या वेळी आला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कारण सांगून महाराजांच्या ट्रस्टला त्यांनी नोटीस बजावली. तर लिमयेवाडी येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वत: पोलीस आयुक्त जातीने त्या भागात आले आणि योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना केली. आयुक्तांनी ज्या पध्दतीने परिस्थिती हाताळली, तसे पोलिस अधिकारी यानी देखील पाहिले तर वादाचा प्रक़ार टाळणे शक्य होते.
ज्या ठिक़ाणी हिंदू अल्पसंख्य होतो, तिथे जिहादी विचार वाढतो. शेजारच्या बांगला देशात आपण जे पाहातो, ती वेळ येथील हिंदुंवर आली नाही पाहिजे. त्यासाठी शंभर टक्के मतदान करा,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी संतांचे वचन आणि शिवाजी महाराजांची नीती आणि महाभारतामधील धर्म-अधर्म याचीही उदाहरणे सांगितली. हिंदू धर्म आणि हिंदू समाजाचे हित मतदान करण्यात आहे. त्यासाठी जागरूक रहा, असे महंत रामगिरी महाराजांनी सांगितले.
What's Your Reaction?






