दिलासादायक : ३० सप्टेंबर २०२३ च्या विद्यार्थी संख्येनुसार पद निश्चिती
शिक्षकेतरांच्या संचमान्यतेला मुहूर्त; पद भरतीचा मार्ग खुला

सोलापूर: पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा प्रक्रिया राबवल्यानंतर आता बहु प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही मुहुर्त लागला आहे. ३० सप्टेंबर २०२३ रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारावर ही संख्या निश्चित होईल. त्यासाठी २८ जानेवारी २०१९ च्या सुधारित आकृतिबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादित व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मयदित संस्थांना पदे अनुज्ञेय केली जातील. विशेष म्हणजे २०२३-२४ च्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगीनला उपलब्धही करून देण्यात आली आहे. ती शाळांना दिल्यानंतर किती पदे भरली
जातील याबाबत स्पष्टता येईल. शिक्षकेतर कर्मचारी भरतीची स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. संचमान्यतेमुळे भरती प्रक्रियेला करता येत नव्हती. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी संचमान्यतेनुसार पद निश्चिती करण्याचे
निर्देश सर्वच जिल्हा परिषदेच्या विभागांना दिले आहेत. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
*शाळांकडून माहिती भरून घेण्याची प्रक्रिया सुरू*
*रिक्त पद पडताळणी समायोजनाने भरती*
आकृतिबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मयदित व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांची पडताळणी जादा पदे मंजूर करून संच मान्यता निर्गमित कराव्यात. आकृतिबंधानुसार शिक्षकेतर पदांची संच मान्यता ३० सप्टेंबर २०२३ रोजी नोंदवलेली व संच मान्यता झालेल्या
आधार वैघ विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असेल, तर मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्वपरवानगीने करावी लागणार आहे. त्यामध्ये रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी लागेल.
शाळांकडून माहिती मागवणार संच मान्यता मिळालेल्या आहेत. बऱ्याच वर्षापासून त्या नव्हत्या. समायोजन केले जाईल. जिथे कमी तिथे भरती जिथे अधिक तेथील कर्मचारी इतर शाळांमध्ये वर्ग केले जातील. किती पद संख्या आहे, हे संचमान्यतेची माहिती शाळांकडून आल्यानंतरच सांगता येईल.
- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
What's Your Reaction?






