संघ प्रचारक ते भाजपा कुशल संघटक सुनील जी देवधर

असू पत्थर पायातील... गत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुनील देवधर पुण्यात सक्रिय होते. आहेत. परंतु राजकीय समीकरणात देवधर यांना डावा कौल मिळाला.

Jun 22, 2025 - 10:15
 0  305
संघ प्रचारक ते भाजपा कुशल संघटक सुनील जी देवधर

(विजयकुमार पिसे)

  असू पत्थर पायातील... गत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुनील देवधर पुण्यात सक्रिय होते. आहेत. परंतु राजकीय समीकरणात देवधर यांना डावा कौल मिळाला. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे संघाविषयीचे वक्तव्य आणि त्यांच्या काळात संघप्रचारक म्हणून संघटनेत आलेले कार्यकर्ते संघटनमंत्री यांची महाराष्ट्रात उपेक्षा झाली. तसेच महाराष्ट्र प्रदेशस्तरावर कार्यरत अलीकडच्या दोन अध्यक्षांनी त्यांचीच (स्वत:ची) जागा भक्कम करण्यात शर्थ केली. त्यामुळे आत्ता आणि यंदा नक्कीच संधी मिळणार हे वास्तव प्रत्येकवेळी धूसर होत गेले. त्यापैकीच एक म्हणजे सुनील देवधर. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा वा विधान परिषद अशा अनेक ठिकाणी इनकमिंगसाठी रेड कार्पेट आणि आपल्या घरातील अनेक हिरे उपेक्षित हे वर्तमान चित्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे आहे. 

   स्वाभिमानी आणि समर्थ भारताचे जागरण पर्व 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनापासून सुरू झाले. गत 11 वर्षात वैश्‍विक पातळीवर स्वाभिमानी आणि समर्थ पर्वाची अनुभूती आणि अनुभव भारतीय जनमानस घेत आहेच. त्यास अनुसरून संघ प्रचारक आणि भाजपा कुशल संघटक सुनील देवधर आज बुध्दिजीवी तसेच प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद साधण्या निमित्त येत आहेत. गतवर्षी 14 ऑगस्ट रोजी अखंड भारत विषयावर हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांचे व्याख्यान झाले. विकसित भारताचा अमृतकाळ सेवा सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्षे कशी होती, आणि आगामी सन 2047 स्वातंत्र्याच्या शताब्दी पर्वात कशी राहील हे देवधर शिक्षक संवादातून उलगडून सांगणार आहेत वर्षभरात दुसर्‍यांदा आम्हा सर्वांना श्री सुनील देवधरांच्या श्रवणभक्तीचा दुग्धशर्करा योग येत आहे.

  शहरी नक्षलवादाला गाडले..

 सुनील देवधर यांच्या कर्तृत्वाचा झपाटा 2018 मध्ये त्रिपुरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसला. शहरी नक्षलवाद विचाराच्या सरकारचे तब्बल 25 वर्षांनंतर सत्तांतरण झाले. अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सुनील देवधर यांची त्रिपुरा राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्रिपुरात भाजपाने न भूतो... असे दैदीप्यमान यश मिळवले. सुनील देवधर यांचा या विजयात सिंहाचा वाटा होता. डाव्यांची 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकली म्हणून या विजयाचे महत्त्व मोठे आहे. 

   श्री देवधर शिक्षकांचा माझा पहिला परिचय झाला 1990 मुंबईत विले पार्ले येथे तृतीय वर्ष संघ शिक्षितांच्या अभ्यासवर्गात. त्यानंतर ते विभाग प्रचारक म्हणून (1998) सोलापूरला आले तेव्हा. प्रचारक म्हणून लाभलेला सहवास तसेच संपर्क, संवादाची हातोटी, आणि सहजता आम्हा स्वयंसेवकांना भारून टाकणारे आहे. या दरम्यान 1991 मध्ये पूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी राष्ट्रसमर्पण पर्वात अधिकाधिक तरुणांनी घर सोडावे असे आवाहन केले होते, तेव्हा सुनीलजींनी मुंबईतील नोकरी सोडली व ईशान्य भारतातील मेघालयात जिल्हा प्रचारक म्हणून गेले. या भागात मिशनर्‍यांचे काम प्रभावी. जनजातीयांमध्ये 75% हून अधिक धर्मांतरण. प्रतिकूल परिस्थितीत सुनील देवधर यांनी खाँसी या जनजातीयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याचा परिणाम म्हणजे पूर्वांचलात संघाच्या माध्यमातून भाजपाचा मजबूत पाया झाला. आणि त्रिपुरात झालेले सत्तांतरण. आजही (दुसर्‍यांदा) त्रिपुरात भाजपाचे स्थिर सरकार आहे. ही व्यवस्था पार पडल्यानंतर देवधर तिथेच रेंगाळले नाहीत. पक्षाने आंध्र प्रदेशाच्या मोहिमेवर त्यांना पाठवले. आंध्र प्रदेशात दोन निवडणुकानंतर आज भाजपाची भक्कम स्थिती झाली आहे. शिवाय जगनमोहन सरकारही हटले. तसेच दक्षिण भारतात (तेलुगू देशम) चंद्राबाबू नायडू आणि (जनसेना पार्टी) पवन कल्याण हे दोन नवे मित्र भाजपाशी जोडले गेले. लोकसभेत नायडू यांची मोदी मोलाची साथ मिळाली. आन्ध्रात भाजपा आता सत्ता पक्षासोबत (एनडीए) आहे. मे मध्ये आन्ध्रात विहिंपच्या बैठकीनिमित्त माझा प्रवास झाला, तेव्हा देवधर यांची स्थानिक पदाधिकारीनी आठवण काढली. अर्थात भाजपाचे पुढील लक्ष्य तमीळनाडू व तेलंगाणा हे आहेच.

*गडकरींनी हेरले; मोदी, शहांचाही विश्‍वास..

    संघ प्रचारक सुनील देवधर यांच्यातील कुशल संघटकाचे गुण हेरले नीतीन गडकरी यांनी. अचूक़ पारख असली की संधीचे सोने होते. गडकरी जेव्हा (2010) राष्ट्रीय अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी पूर्वोत्तर भारत संपर्क प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक म्हणून त्यांची नियुक्ती केली, देवधर यांच्या भाजपा संघटनेतील कार्याची ही सुरवात. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात (2012) गुजरात विधानसभा निवडणुकीत दाहोद जिल्हयाची जबाबदारी. त्याची यशस्वीता दिसली. त्यामुळेच मोदी यांचा विश्‍वास संपादन केला. 2014 साली मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात सुनील ओझांसह देवधर प्रचार प्रमुख होते. त्यांची चढती कमान महाराष्ट्रातील विधानसभेतही दिसली. 62 विधानसभा मतदारसंघातील कमकुवत बूथ त्यांनी सांभाळले. गडकरींपासून अमित शहांपर्यंतच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जो विश्‍वास टाकला, त्याची उपलब्धीही पक्षाला मिळाली. पण या बदल्यात महाराष्ट्रात सुनील देवधर यांच्या कार्यकर्तृत्वाचे फलित त्यांच्या पदरात पडले नाही, असे खेदाने नमूद करावे लागते. "नमे: कर्मफले स्पृहा:" अर्थात कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करीत राहणे हे सुनील देवधर यांच्यातील गुण त्यांचे पिताश्री तरुण भारतचे पूर्व संपादक स्व. विश्‍वनाथ देवधर यांच्याकडून मिळाले आहेत. 

असू पत्थर पायातील... 

गत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देवधर पुण्यात सक्रिय होते. आहेत. परंतु राजकीय समीकरणात देवधर यांना डावा कौल मिळाला असावा. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे संघाविषयीचे वक्तव्य आणि त्यांच्या काळात संघप्रचारक, संघटनेत आलेले कार्यकर्ते संघटनमंत्री यांची महाराष्ट्रात उपेक्षा झाली, असे अनुमान आहे. तसेच महाराष्ट्रात प्रदेशस्तरावर कार्यरत अलीकडच्या दोन अध्यक्षांनी त्यांचीच (स्वत:ची) जागा भक्कम करण्यात शर्थ केली. त्यामुळे आत्ता आणि यंदा नक्कीच संधी मिळणार हे वास्तव प्रत्येकवेळी धूसर होत गेले. त्यापैकीच एक म्हणजे सुनील देवधर. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा वा विधान परिषद अशा अनेक ठिकाणी इनकमिंगसाठी रेड कार्पेट आणि आपल्या घरातील अनेक हिरे उपेक्षित हे वर्तमान चित्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow