सुशीलकुमार शिंदे कहे दिल से! मै डर गया था, आता काश्मीर आहे निडर!
सुशीलकुमार शिंदे कहे दिल से! मै डर गया था, आता काश्मीर आहे निडर! दिसतोय फरक 370 कलम हटवल्यामुळे

मै डर गया था! देशाचे गृहमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे जेंव्हा काश्मीरच्या लाल चौकात गेले होते तेव्हा, आणि आज ह्याच लाल चौकात काय माहोल आहे. केंद्रात भाजपाचे मोदी सरकार आल्यानंतर 2019 मध्ये 370 कलम हटवल्यानंतरचे जे आहे. नवी दिल्लीत आज शिंदे यांच्या आत्मकथनात्मक पुस्तक प्रकाशनानिमित्त शिंदे यांनी गृहमंत्री म्हणून तेव्हाची एक आठवण सांगितली. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्यानंतर त्यांनी लाल चौकात नागरिकांशी संवाद साधला. त्यांना आपलेसे केले. त्यामुळे मला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र मनातून मी खूप घाबरलो होतो. डर होता. ही वस्तुस्थिती गृहमंत्री या नात्याने शिंदे यांनी मान्य केली. पण आज त्याच लाल चौकात काय वातावरण असेल, सर्वच राजकीय पक्षांच्या रॅली होतात, नागरी सामान्य व्यवहार सुरळीत आहेत. गृहमंत्री म्हणून शिंदे यांना जो डर होता, तो डर आज संपला आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर , चे हे चित्र आहे. त्या लाल चौकात देखील डर नाही. ३७० कलम हटवल्यानंतर हे आजचे वास्तव आहे. दहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी दहा ते 14 टक्के होती. मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत देशातील सर्वाधिक 84%टक्के मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहे. आता तिथे विधानसभेच्या मुक्त वातावरणात निवडणुका होत आहेत. अशा स्थितीत शिंदे यांचे विवेचन बोलके आहे. विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या संदर्भात स्थानिक लोक 370 हटवल्यानंतर राजकीय आर्थिक व सामाजिक संवर्धन सौहार्द प्रस्थापित झाला आहे. तेथील दल सरोवरातील शिकाऱ्याचे मालक अनिस अहमद म्हणाले, आता पर्यटकांची संख्या वाढली आहे. लोक निर्भयपणाने येथे पर्यटनाचा आनंद घेतात. चहा विक्रेते जुबेर मिल म्हणाले, दररोजचे ग्राहक वाढले आहेत. आम्हाला चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. 2014 पूर्वी आम्ही खायला त्रासलो होतो. याचा अर्थ 370 कलम हटवल्यामुळे खऱ्या अर्थाने जीवन सुखावह झाले आहे. जे 2014 पूर्वी नव्हते. म्हणजेच शिंदे कहेी दिल से!
What's Your Reaction?






