स्त्री शक्तीचे अर्धशतक.... स्त्री मुक्तीचे अर्धशतक... सन्मान आणि समानतेचे अर्धे जग
8 मार्च महिला दिन विशेष 8 मार्च स्त्री शक्ती दिन .... स्त्री शक्तीचे अर्धशतक.... स्त्री मुक्तीचे अर्धशतक... सन्मान आणि समानतेचे अर्धे जग

8 मार्च 1975 मध्ये महिला दिनाची सुरवात झाली. आज महिला दिन अर्थात स्त्री शक्तीची पन्नाशी होय. या पन्नास वर्षात अनेक संघर्ष झाले. स्त्री समानतेच्या चळवळी झाल्या. आणि या पन्नास वर्षात समानता आली. स्त्री पुरुष समानता, समान हक्क, समान अधिक़ार. आणि सन्मानही...
राष्ट्रमाता माँ जिजाऊ, लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य समस्त भारतीयांसमोर मानदंड. त्यांची ओळख म्हणजे स्त्री शक्तीचा अभिमान, सन्मान आणि अधिकार.
उद्योग व्यवसाय, नोकरी, खेळ, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रही गाजविले. धरती नभ पाताळही भारू अशी दिग्गंत कीर्ती. शिवाय राजकारण असो वा सत्ताकारण... सर्वोच्च पदावर स्त्रीचा सन्मान आणि अधिकार. त्यामुळे आज देशाच्या राष्ट्रपती आदिवासी वर्गातील द्रौपदी मुर्मू विराजमान. स्वातंत्र्यानंतर दोन युध्दं झाली आणि देश जेव्हा तारुण्याच्या उंबरठ्यावर होता, तेव्हा इंदिराजीनी कणखर प्रधानमंत्री म्हणून भूमिका बजावली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एकाचवेळी काँग्रेस पक्षाध्यक्षा आणि यूपीए आघाडीचे नेतृत्व केले, आज दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, विरोधी पक्षनेते आतिशी हा योगायोग आहे. पण अभिमान आणि सन्मानही.
स्त्री सृष्टीकर्ती, तीच गुरू आणि मातापिता सर्वकाही. आपल्या बाळाला चांगला मनुष्य घडवते. त्याला मार्ग दाखवते. जिथे आपण नतमस्तक होतो. ते स्थान म्हणजे स्त्री. एक अर्धे जग जिथे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान म्हणजे स्त्री शक्ती
जागतिक महिला दिनासाठी 8 मार्च हा दिवसच का नक्की झाला. ..निमित्त होते, अमेरिकेत महिला अधिकारासाठी पहिले आंदोलन. न्यूयॉर्क येथे 1908 मध्ये कामगारांना सन्मानित करणेसाठी हा दिवस निवडला. रशियात महिलांनी पहिल्या महायुध्दास सर्वप्रथम विरोध केला. 1917 रशियातच महिलांनी आंदोलन केले. आणि युरोपात विश्वशांतीसाठी शांततापूर्ण वातावरणासाठी रॅली काढली.
आज या निमित्त आपण स्त्री शक्तीचे जागरण करणार आहोत. समाजात विशेषतः राजकीय आणि सत्ताकारणात समानता येण्यासाठी सर्वप्रथम आरक्षणाची हाक देणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहकार क्षेत्रात स्त्री अधिकाराची गजर झाला. स्त्री हक्काची नांदी म्हणजे महापौर, सभापती, अध्यक्ष या पदावर महिला विराजमान झाल्या. आगामी काळात देखील महिलांना पुन्हा पुन्हा संधी मिळाली पाहिजे यासाठी त्यांच्या कार्याची ओळख देण्याचा लक्ष्यवेध न्यूज पोर्टलचा प्रयत्न.....
@ विजयकुमार पिसे,सोलापूर #
What's Your Reaction?






