ऑगस्ट अखेर सोलापूरची विमान सेवा शक्य!
सोलापूर विचार मंचचा विश्वास मागणीला उपमुख्यमंत्र्यांकडून मेल : डॉ. संदीप आडके यांची माहिती
सोलापूर: सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरील सर्व कामे पूर्ण होऊन दोन दिवसांपूर्वीच त्याच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाली. याची काही छायाचित्रे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे या ऑगस्ट अखेरीस विमान उडान शक्य आहे, असा विश्वास सोलापूर विचार मंचने व्यक्त केला आहे. तसेच याबाबतचा मेल उपमुख्यमंत्र्यांकडून प्राप्त झाला, अशी माहिती डॉ. संदीप आडके यांनी दिली.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांनी नागरी उडयन मंत्रालयाचे मंत्री किनीजारापू नायडू व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया, डायरेक्ट जनरल डीजीसीए, जनरल मॅनेजर उडान व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत मेल पाठवलेला होता. डॉ.आडके यांना जानेवारी महिन्यातच प्रधानमंत्री कार्यालयाकडून ही तारीख कळवण्यात आलेली होती. तसेच गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विमानतळाच्या देखरेखीसाठी पोलीस अथवा सीआयएसएफ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून सुजाता सौनिक, अप्पर मुख्य सचिव यांना योग्य कारवाईसाठी सूचना देण्यात आल्याचा ई-मेल प्राप्त झाला आहे, असे डॉ. आडके म्हणाले.
आगामी निवडणुकीच्या काळात ही विमान सेवा सुरू होणे शक्य आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत येथील उर्वरित कामे पूर्ण करून तातडीने विमान सेवा सुरू करावी हा आग्रही भूमिका सोलापूर विचार मंचची आहे.
त्यांच्या प्रयत्नास आता यश आलेले दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यापारी व नागरिकांनी अशा मागणीचा रेटा लावण अपेक्षित आहे. तर नक्कीच ऑगस्टपर्यंत सोलापुरातून विमान उडेल.
What's Your Reaction?






