26/11 चा मास्टर माईंड तहव्वूर भारताच्या ताब्यात, तहव्वूर राणाला आज भारतात आणणार, पाकला झटका

26/11 मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड तहव्वूर राणाचे सगळे पर्याय संपले असून आता त्याला भारताच्या ताब्यात सोपवले जाणार आहे.

Apr 10, 2025 - 01:53
Apr 10, 2025 - 02:00
 0  264
26/11 चा मास्टर माईंड तहव्वूर भारताच्या ताब्यात, तहव्वूर राणाला आज भारतात आणणार, पाकला झटका


(विजयकुमार पिसे)

26/11 मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड तहव्वूर राणाचे सगळे पर्याय संपले असून आता त्याला भारताच्या ताब्यात सोपवले जाणार आहे. आज अमेरिकेकडून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि आज कोणत्याही क्षणी भारतात आणले जाईल.  तब्बल 17 वर्षानंतर 26/11 च्या घातपाती कारवाईचा मुख्य मोहरा हाती लागल्यामुळे पाकिस्तानचा  खरा चेहरा समोर येणार आहे. हे भारत सरकारच्या डिप्लोमसीचे यश मानले जात आहे.

2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड तहव्वूर राणा कोणत्याही क्षणी भारत सरकारच्या ताब्यात येणार असून आज 10 एप्रिल रोजी त्याला अमेरिकेतून भारतात आणले जाणार आहे. तहव्वूरच्या प्रत्यार्पणाचा अर्ज अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने 4 एप्रिल रोजी फेटाळून लावल्यामुळे राणाचे सगळे पर्याय संपले आहेत. तसेच त्याला ताब्यात घेण्यासाठी भारत सरकारच्या एनआयए, रॉ आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सात अधिकार्‍यांची एक टीम तातडीने अमेरिकेत दाखल झाली आहे. ते न्यूयॉर्कहून भारताकडे  निघाले आहेत, अशी मध्यरात्रीची ब्रेकींग न्यूज माहिती आहे.
    अमेरिकेच्या दौर्‍यात मोदी यांनी ट्रम्प सरकारकडे यासंबंधी मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूरला ताब्यात देण्याविषयी भूमिका स्पष्ट करून भारताला पाठिंबा दिला होता.  पाक सैन्यात डॉक्टरी सेवा बजावलेला तहव्वूरकडे कॅनडा  सरकारचे  नागरिकत्व आहे.  26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी कारवायात मुंबईत बॉम्बस्फोटाची मालिका घडवली, तेव्हा 166 निष्पाप नागरिक मारले गेले. तसेच काही प्रमुख पोलीस अधिकार्‍यांनाही हौतात्म्य मिळाले होते. यामध्ये सोलापूरचे तत्कालिन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांचाही समावेश होता. दरम्यान या हल्ल्यातील एक दहशतवादी अजमल कसाब पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यावर खटला चालवून भारत सरकारने फाशी दिली. पण मास्टर माईन्ड तहव्वूर राणा मोकाट होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा दुसरा अंक सुरू होणार आहे. तसेच पाकिस्तान या घातपाती  कारवायात किती सक्रिय होता, ही बाब देखील उघड होणार आहे. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या मोदी सरकारच्या रणनीतीचे हे यश मानले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow