आडम मास्तर म्हणाले, मी १ लाख वेळाश्रीराम शब्द लिहिलेय
मास्तरांना आमदार करण्याचा तेलुगू भाषिक तरुणांचा निर्धार !

मी 1955 साली माझ्या बालपणी रामायणाची पोथी वाचत असे. त्यावेळी रामनवमीला मारुती मंदिरात तेथील पुजारी यांनी श्रीराम हे शब्द 1लाख वेळा कोण लिहितील त्यांना 1 रुपया बक्षीस मिळेल असे जाहीर केले त्यावेळी आमच्या मित्रान्त
लागलेली पैज मी जिंकली. मी एकटाच 1 लाख वेळा श्रीराम लिहून श्रीराम मंदिरांच्या पुजारीना अर्पण केले आणि 1 रुपया बक्षीस मिळवले.तेव्हा पासून पुराणात दाखवलेल्या श्रीरामांचा मार्ग अवलंब करत आजमितीस मी जनतेची निस्पृह सेवा करत आहे. लोकशाही अधिष्ठित रामराज्य आले पाहिजे. रामाच्या नावाने राकारण करणारे लोकांची सेवा करावी दिशाभुल करू नये अशी टीका आडम मास्तर यांनी केली.
कॉ. गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार वसाहत कुंभारी येथे स्थानिक सर्व तेलुगू भाषिक तरुणांच्या मेळाव्यात आडम यांनी हि माहिती दिली. मुरलीधर सुंचू यांच्या अध्यक्षतेखाली होते.
यावेळी स्थानिक तरुणांनी वसाहतीतील समस्यांबाबत चर्चा केली.प्रामुख्याने वसाहतीत घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी, अवैध धंदे, बेकायदेशीर दारू अड्डे, बेरोजगार तरुणांना रोजगारराच्या संधी, विद्यार्थिनींनीसाठी वरिष्ठ महाविद्यालय, महिलांसाठी घरगुती काम यासंबन्धी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आडम मास्तरांना आमदार करण्याचा निर्धार केला.
यावेळी पुढे बोलताना आडम म्हणाले की, निरंतर परिश्रमातून गोदूताई वसाहतीत लोकांच्या पिण्याची पाण्याची टंचाई दूर केली आहे. वसाहतीत सर्व तेलुगू भाषिक लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.ही एकी चिरंतन राहावी.आपल्या श्रद्धा प्रती मी प्रचंड आदर करतो.तरुणांनी मांडलेले मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे व कळीचे आहेत.त्याला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
तरुण हे या देशाचे भवितव्य असून ते आज अंधारात चाचपडत आहे.हे अत्यंत गंभीर आहे. एवढेच नसून
बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे मात्र सरकार याबाबत उदासीन आहे. यासाठी तरुणांनी वज्रमूठ आवळण्याची गरज आहे. यासाठी आपण मैदानात उतरले पाहिजे, असे म्हणाले.
यावेळी अशोक इंदापूरे , ॲड.अनिल वासम,अशोक बल्ला आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मधुकर पुठ्ठा, नितीन यादगिरी, बालाजी कोडम, रवि गेंट्याल ,राजू मिठ्ठा आदी तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन विजय हरसुरे व आभार प्रदर्शन योगेश आकीम तर
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी दिनेश बडगु, नरेश गुल्लापल्ली,शाम आडम, चंटी बिटला, बाळकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्लाळ,बालाजी तुम्मा, नागेश जल्ला, कुमार येलगेटी,प्रभाकर गेंट्याल, राजेंद्र गेंट्याल , राधा गोपालबंडी आदींनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






