एपीएमसीचा सभापती कोण... माने, हसापुरे की शिवदारे, अलगोंडा?

27 एप्रिलनंतर नवा ट्वीस्ट...उत्तर आणि दक्षिण वादाला फुटेेल तोंड, वेळप्रसंगी शिवदारे, हसापुरे साथ साथ है? सभापतीपदासाठी फाटाफूट झाली तर त्याचा लाभ कुणाला? सुशीलकुमार आणि प्रणितीताई शिंदे यांची साथ कोणाला?

Apr 26, 2025 - 01:21
 0  196
एपीएमसीचा सभापती कोण... माने, हसापुरे की शिवदारे, अलगोंडा?

(विजयकुमार पिसे)
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन पॅनल समोर आल्यानंतर प्रस्थापित काँग्रेसचे पॅनल तुल्यबळ आहे. त्यामुळे बहुमताने निवडून आल्यानंतर सभापती कोण? माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे की इंदुमती अलगोंडा या भोवती निवडणूक़ प्रचार केंद्रित झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कळत न कळत एकमेकांना पाडण्याचा उद्योग नेहमीप्रमाणे झाल्याची चर्चा असून त्यामुळे  उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या वादालाही तोंड फुटेल, त्यामुळे वेळप्रसंगी शिवदारे आणि हसापुरे हम साथ साथ है। च्या भूमिकेत दिसले तर? त्यापार्श्‍वभूमीवर सुशीलकुमार आणि प्रणितीताई शिंदे यांची साथ कोणाला याची देखील उत्सुकता राहणार आहे. 


   विधानसभा निवडणुकीत शिंदे परिवाराच्या खेळीने होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे अनपेक्षितपणे काँग्रेसच्या नेत्यांनी आपापली सोयीची भूमिका पार पाडली. मात्र परिणामः भाजपाने चार विधानसभा मतदारसंघात चौका मारला. त्याचे पडसाद बाजार समिती निवडणुकीनंतर किंवा सभापती निवडीप्रसंगी उमटतील, अशी चर्चा आहे. प्रस्थापित नेत्यांचे वारसदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंडा या प्रस्थापितांना सभापतीपदाची खुर्ची मिळाली. कार्यकर्ता टू नेता असा प्रवास करणारे सुरेश हसापुरे यांना उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले. शिवाय दोन टर्म बाजार समितीच्या बाहेर त्यांना वाळीत टाकले गेले. शिवदारे यांना सभापतीपदावर सन्मानाने बसवले गेले. पण (7 एप्रिल) वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना अवमानकारकरित्या पायउतार केले. याचे शल्य या दोन काँग्रेसी नेत्यांना आहे. शहर मध्य मतदारसंघात गतवेळी (2019) प्रणितीताई यांच्या विरोधात दिलीप माने यांनी निवडणूक़ लढवली, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत माने पुन्हा काँग्रेसवासी झाले. आणि प्रणितीताई यांना लोकसभेत निवडून आणले व रागलोभ निवळला. झाले गेले गंगेला मिळाले, असे वाटले. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी टाकलेले फास त्यांच्यावरच बेतले. 
   बाजार समिती निवडणुकीनंतर दिलीप माने यांचा सभापतीपदावर नैसर्गिक दावा आहे. पॅनल बहुमताने निवडून आले तर निर्विवादपणे त्यांना संधी मिळणे अपेक्षित आहे. शिंदे परिवाराने ना आमदारकी दिली, ना संधी दिली. किमान बाजार समिती ताब्यात दिली तर माने यांना काँग्रेसने न्याय दिला असे मानता येईल.   पण मतदानानंतर आणि सोमवारी मतमोजणी पार पडली आणि   नवा ट्वीस्ट झाला तर निवडून आलेल्या संचालकांची पळवापळवी, शक्तीप्रदर्शन  आणि शेवटी जिसकी लाठी उसकी भैस... या म्हणीप्रमाणे जो बाहुबली तोच खुर्ची बळकावणार हा निसर्गनियम...परंतु डोक्यालिटीने कुणी खेळी केली तर? गयी भै... पाणी मे!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow