दक्षिण सोलापुरात भूमीपुत्र बापू विरोधात एकवटले
म्हणाले, कोणालाही तिकीट द्या आम्ही निवडून आणू!

सोलापूर : गत दोन टर्म भाजपाचे कमळ फुलवलेले आमदार सुभाष देशमुख यांच्याविरोधात दक्षिण सोलापूर मतदार संघात नाराजीची लाट मुंबईत धडकली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिपुत्रांनी निर्धार केला. सुभाषबापू ऐवजी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही निवडून आणू!
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले मताधिक्य हि अँटिइन्कंबसि अधोरेखित झाली आहे. या मतदारसंघात लिंगायत समाज बहुसंख्येने असूनही तो बेदखल झाला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनी एल्गार केला. विशेष म्हणजे भूमिपुत्रांनी लोकसभा निवडणुकीत काडादि यांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडली. त्यामुळे काँग्रेसचे मोठे मताधिक्य रोखले गेले. आता देखील काडादि, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ही महाविकास आघाडी भीमा सिनेच्या कुडल संगमात बुडवण्याच्या निर्धाराने भूमिपुत्रांनी वज्रमूठ बांधली आहे. गुरुवारी श्रीशैल हत्तुरे मामा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे एक शिष्टमंडळ फडणवीस यांना भेटले. यामध्ये शहर, तालुका आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सरपंच यांचा समावेश होता.
माजी मंत्री सुभाष देशमुख
ऐवजी कोणताही भूमिपुत्रास उमेदवारी द्या, आणि त्याला निवडून देऊ. या मागणीसाठी ज्येष्ठ नेते श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली मळसिद्ध मुगळे दक्षिण तालुका भाजपा उपाध्यक्ष, वैभव हत्तुरे नगरसेवक, अप्पू पाटील बिराजदार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीनिवास करली माजि सभागृह नेता सोलापूर महानगरपालिका, श्रीनिवास पुरुड नगरसेवक, अनिल चव्हाण, सचिन चव्हाण संचालक बंजारा समाज तांडा सुधार योजना, अशोक पाटील बिराजदार, नगरसेवक सोमपा बसवराज पनशेट्टी व दक्षिण तालुक्यातील पाच ते सहा गावांचे सरपंच यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा उपुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा सर्वे लावू असे आश्वासन दिले. त्यामुळे भूमिपुत्रांना बळ आले असून उमेदवारी कोणास मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
What's Your Reaction?






