वि.प.साठी भाजपाची ट्वेन्टी 20
अखेरीस भाजपचे धोरण समोर आले. जुन्या चेहर्याना संधी दिली नाही. नागपूरचे माजी महापौर गिरीश जोशी यांना पुन्हा लॉटरी लागली. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी आपटी खाल्ली होती.

(विजयकुमार पिसे)
अखेरीस भाजपचे धोरण समोर आले. जुन्या चेहर्याना संधी दिली नाही. नागपूरचे माजी महापौर गिरीश जोशी यांना पुन्हा लॉटरी लागली. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी आपटी खाल्ली होती.
येत्या 27 मार्चला विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होईल. संख्याबळ पाहता महायुतीच सर्वच्या सर्व जागा जिंकू शकेल. असे आजचे चित्र. भाजपाच्या वाट्याला तीन जागा आहेत. या तीन जागा भाजपा नक्कीच जिंकणार. पण संधी कोणाला देणार. याकडे लक्ष्य आणि लक्ष आहे. जागा तीन आणि इच्छुकांची संख्या मोठी. त्यांंची नाराजी ओढवून का घ्या. म्हणून महाराष्ट्रीयन नेत्यांनी दिल्लीश्वरांच्या कोर्टात 20 चेंडू टाकलेत. पाठवलेत. दिल्लीतील केंद्रीय पक्ष कार्यालयातून मिळालेली ही पक्की खबर. म्हणजे 3 जागांसाठी भाजपा ट्वेन्टी 20 खेळवणार. पक्षात अनेक जाणते आणि जुने नेते आहेत. ज्यांच्या नावाची चर्चा आणि पक्की यादी अनेकदा होते. पण नेहमीच इनकमिंग नेत्यांना संधीप्रयोग. ज्येष्ठ नेतेमंडळींची आता पक्षाला ना गरज ना त्यांची कदर. (उदा....माधव भांडारी, सुनील देवधर, तुषार भोसलेंसह... अन्यान्य...). अशी अनेक नावे पुढे येतात... आणली जातात आणि पुढे गडप. कोथरूडच्या मेधाताई कुलकर्णींचे असेच. कार्यकत्यार्र्नी फक्त त्याग करायचा. सुरक्षित जागेवर बाहेरच्या आयात दादा नेत्यांनी डल्ला मारायचा. पुन्हा वरून त्याग, निष्ठा उपदेशाचा डोस. हे पक्षाला आलेले अच्छे दिन. विधान परिषदेच्या तीन जागांसाठी 20 नावे गेली आहेत. यामध्ये जुन्या नेत्यांची नावे नक्कीच आहेत. असतीलही. पण जेव्हा या नावांवर फुली मारायची वेळ तेव्हा पहिला बळी देखील यांचाच. त्यामुळे ट्वेन्टी 20 मध्ये आउट होणारे 17 जणांना आहे नक्कीच खतरा.
(बुरा ना मानो रंग बरसे)
What's Your Reaction?






