...या पूर्वीच्या भाजपा अध्यक्षांना जे जमले नाही, ते!

पक्ष कार्यालयात आमदार आणि माजी अध्यक्षांचे एक़त्रित चाय-पान, संवाद, कार्यालयाचाही बदलला लूक, नरेंद्र काळे यांचे अशक्य ते शक्य...

Apr 30, 2025 - 19:27
May 1, 2025 - 00:37
 0  659
...या पूर्वीच्या भाजपा अध्यक्षांना जे जमले नाही, ते!

(विजयकुमार पिसे)

 एरवी 6 एप्रिल भाजपा पक्ष स्थापना दिन म्हणजे जेमतेम उपस्थिती. त्या दिवशीचा कार्यक्रम पार पडलेला फोटोही मिळत नसे. म्हणजे फोटो काढणे शक्य नाही. असा स्थापना "दिन" अगदी "दीन" साजरा होत असे. हा आजवरचा अनुभव. पण यंदा 6 एप्रिलच्या कार्यक्रमास आमदार देशमुखद्वय, दोन माजी पक्षाध्यक्ष आणि माजी आमदारांची उपस्थिती. त्याचा एकत्रित चाय-पान आणि संवाद. हे कसे काय? अशक्य ते शक्य करतील.... असे म्हटले जाते. हा सुखद धक्का. नरेंद्र काळे यांनी अध्यक्ष म्हणून ही सरस कामगिरी, शिवाय त्यांनी कार्यालयाचा लूक़च बदलून टाकलाय. यापूर्वीच्या अध्यक्षांना हे का जमले नसावे?

   नरेंद्र काळे यांच्या आधी म्हणजे 2007 पासून रामचंद्र जन्नू, आ.विजय देशमुख, अशोक निंबर्गी, विक्रम देशमुख ही जाणती मंडळी पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहिले. पक्षविस्ताराबरोबरच आता कार्यालयाचाही विस्तार झाला आहे. (गेल्या शनिवारी 26 रोजी संघ परिवारच्या समन्वय बैठकीत नरेंद्र काळे सोलापुरातील पक्ष विस्ताराची माहिती सर्व उपस्थितांसमोर विषद केली.) याशिवाय प्रशस्त, हवेशीर बैठक व्यवस्था. अ‍ॅन्टी चेंबर, मिटींग हॉल, कार्यालयीन प्रशासकीय कामकाज व्यवस्था अशा सुविधा येथे आहेत. त्यामुळे आता कार्यालयात येणे, बसणे, चर्चा, बैठक़ा अशी वर्दळ वाढणे अपेक्षित आहे. पक्षाच्या बहुतेक बैठक़ा तसे स्थानिक आमदारांच्या संपर्क कार्यालयातच पार पडतात. किंवा हेरिटेज, शांतीसागर मंगल कार्यालय हे ठरलेले. आता पक्षाच्या कार्यालयातच या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे इकडे न फिरकणारे कार्यकर्ते व नेते मंडळी आवर्जून येतील, ही अपेक्षा. गत टर्ममध्ये विक्रम देशमुख यांनी दोन्ही आमदार देशमुखांच्यामध्ये दुवा म्हणून यशस्वी भूमिका पार पाडली. त्यामुळे उभयतांमधील संघर्ष समोरही आला नाही, ना दिसला. शिवाय कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातही चांगला मेळ जमला. 

     6 एप्रिल रोजी पक्ष स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला. आ.सुभाष आणि आ. विजयकुमार देशमुख, माजी आ.नरसिंग मेंगजी, रामचंद्र जन्नू, किशोर देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी यावेळी हजेरी होती. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था होती. त्याचा आमदार देशमुखद्वय यांनीही आस्वाद घेतला. त्यात अन्य पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी होते. दिलखुलास गप्पांमध्ये देशमुख रंगले. त्यामुळे हे कसे शक्य आहे, हा प्रश्‍नार्थक मुद्दा उपस्थित करून अ..शकुन प्रयत्न काही जणांचा होतो. नरेंद्र काळे विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, आणि संघ व्यवस्थेत जबाबदारी घेऊन संघटनेचे काम केले आहे. हे संघटन संवाद आणि संपर्क पक्षाध्यक्षाची धुरा हाती आल्यानंतर उपयोगी पडले, अध्यक्ष नरेंद्र काळे यांचे हे प्रांजळ मत.

अर्थात उलझे सुलझे प्रश्‍नोंका है उत्तर केवल एक। रेष पुसण्याऐवजी आपणच दुसरी नवीन मोठी रेष ओढली की सगळ्या समस्या पार होतात, याचाच अर्थ संघटन मे शक्ती है। शत प्रतिशत....

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow