देवाभाऊचा डंका!
देशात नरेंद, राज्यात देवेंद्र पर्व ३

(विजयकुमार पिसे)
मै समंदर हूँ, लौटके आऊंगा!
तब्बल 1855 दिवसांनी देवा भाऊंच्या हाती छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे राज्यशकट आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याचा तरुण मुख्यमंत्री म्हणून 2014 मध्ये देवाभाऊंनी यशस्वी कारभार पाहिला. 2019 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पुन्हा बहुमत मिळाले. आणि 72 तासांसाठी मुख्यमंत्री झाले. पण नतदृष्ट राजकारण्यांनी सत्तेसाठी काय पण असा चंग बांधून फडणवीसांना हक्काची खुर्ची मिळू दिली नाही. *मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना! मै समंदर हूँ लौटकर वापस आऊंगा!!* हा शेर फडणवीस यांनी तेव्हा विरोधकांना सुनावला होता. पण अशा नतदृष्टांना 2024 मध्ये मतदारांनी जागा दाखवली आहे. आता त्याच विरोधकांना विधानसभेत विरोधी पक्षनेते पदही शाबूत ठेवता आले नाही, इत:पर मावा आघाडीला जनतेने हद्दपार केले आहे. देवाभाऊ रिटर्नचा डंका वाजणार आहे.
यानिमित्ताने मोदींनीच केलेल्या घोषणांचे स्मरण होत असून, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र! मोदी यांचे विश्वासू अशी फडणवीस यांची प्रतिमा. ती आजही कायम आहे. याचे कारण म्हणजे फडणवीस यांचा प्रचंड आत्मविश्वास. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी प्रचार रॅलीत ३०० कमळ देशभरातून फुलले पाहिजेत असे सांगत मतं मागत होते. तेव्हा महाराष्ट्रातून किती जागा मिळणार, हा आकडा अन्य नेत्यांकडून २० पर्यत सांगितला. तर देवेंद्र फडणवीस यांनी ४० खासदार निवडून येतील, असे सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे त्या निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि सोनिया काँग्रेस यांची अवस्था नॅनो कार झाली होती. भाजपा शिवसेनेने तब्बल ४१ जागा जिंकल्या होत्या. शरद पवार यांच्या भोवतीच राज्याचे राजकारण केंद्रित असते. ह्या समजास फडणवीस यांनी लक्ष्यवेध केला. तसेच राज्यातील सर्वच पक्षांचे बहुतेक नेते पवारांशी जुळवून घेत राजकारण करतात. फडणवीस हे त्यापैक़ी नव्हेत. ही बाब अधोरेखित झाली. मोदी यांना असाच राजकारणी अपेक्षित होता. फडणवीस यांचे हे गुण नोदी यांनी हेरले. आणि त्यांच्या हातात राज्याच्या सत्तेची सूत्रे बहाल केली. आज दहा वर्षानंतरही देवा भाऊंचा हा ट्रेंड कायम राहिला आहे. पवार यांच्या राजकारणाला पुरून उरणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणूनच देवाभाऊंचा डंका खणखणीत आहे.
मी पुन्हा येईन हा आत्मविश्वास बाळगूनच फडणवीस यांनी राजकारण केले. यंदाच्या निवडणुकीत फडणवीस यांच्याविषयी एक़ आश्चर्यजनक माहिती पुढे आली. प्रत्येकाला वाटते मुंबईत आपले हक्काचे, स्वत:चे घर. यास अपवाद फडणवीस आहेत. राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री, दोनदा विरोधी पक्षनेते आणि एकदा उपमुख्यमंत्री ही घटनात्मक पदं सांभाळणारा नेता मुंबईत स्वत:चे घर घेवू शकला नाही. हा निरपेक्ष भाव प्रक़ट होतो. फडणवीस यांचे कडील गृहमंत्रीपद विरोधकांना नेहमीच खुपते. त्यांची होणारी अडचण पाहता फडणवीस यांनी कुशलतेने गृह खाते सांभाळले. विरोधकांना नाकी नव आणले. सात वषापूर्वीची भीमा कोरेगावची दंगल आणि शहरी नक्षलवाद ठेचून काढण्याची फडणवीस यांची कठोर भूमिका पाहता असा मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडील गृहखाते ह्या दुहेरी भूमिकेत फडणवीस शतप्रतिशत खरे ठरले आहेत. देवाभाऊंचा डंका म्हणजे विरोधक़ांची लंका. विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना मिळालेल्या फक्त ४६ जागा हेच सांगतो. संघ स्वयंसेववक फडणवीस कृतसंकल्प स्वयंसेवक कार्यकर्ते आहेत. संघाचाही त्यांच्यावर विश्वास ही त्यांची जमेची बाजू. संत, महंत,धर्माचार्य यांचेही आशिर्वाद यामुळे देवेंद्र पर्व ३ निश्चितच आश्वासक ठरणार आहे.
देवेंद्र पर्व ३ मध्ये २०२९ चौकाराची भक्कम पायाभरणी अपेक्षित आहे. विरोधी पक्षमुक्तची ही सुरवात. "पावर अस्त" अटळ आहे. जे मोदींना अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाकरिता आवश्यक. एक है तो सेफ है, आणि मोदी है तो मुमकीन है। याची प्रचिती पुढील काळात येत राहणार हाच तो विश्वास! देवाभाऊंचे अभिनंदन आणि शुभेच्छा!!
What's Your Reaction?






