हे धर्मयुध्दच!
हे धर्मयुद्धच!

(विजयकुमार पिसे)
राज्यात भाजपाविरोधात अनेकांनी व्होट जिहादचा आसरा घेतला आहे. एक़ है, तो सेफ है। त्यामुळे पर्सनल ला बोर्डाचे नेते नोमाणी यांचा तो व्हिडीओ समोर आल्यानंतर राहुलबाबा,पवार,ठाकरे, आणि ओवैसी यांचा मिलीभगत चेहरा पर्दाफाश झाला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हे धर्मयुध्द आहे. यापासून सावध रहा, याकडे सगळ्यांचे लक्ष्यवेध केले. तरीही जाती-जातीत विभागलेला समाज हिंदू ऐक्याला छेद देण्याचा प्रयत्न करतोय. सोलापुरात कुठे (तुतारी) घ्या, कुठे (काम्प्युटर) चालवा अशी हाळी दिली जात असल्याच्या वार्ता कानावर येत आहेत. बैठक़ा झडत आहेत. पूर्व भागातील एका सहकार रुग्णालयाच्या संचालकानेे यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. रविवारी एका व्यापक बैठक़ीत उपस्थित दोन डॉक्टर संचालक द्वयांनी पद्म-कमळ आणि भाजपा हाच आपल्या समाजाचा आत्मा आहे. तोच देशाचा, राज्याचा आपल्या गावाचा विकासक आहे. हे मार्मिक़पणे सांगितले. तरीही कोण (सुधा)रणा (कर)णार नसतील तर मग हा कास्ट जिहादचा, व्होट जिहादपुढे निभाव लागेल का? मा मनसुलू, तम मंदी मनशा, अशी गल्लत कुणी करीत असतील तर मग घात झाला. नंतर पश्चाताप करण्यात हशील नाही. लक्षात घ्या, हे धर्मयुध्द आहे. सिर्फ कमल खिलेगा! यातच हिंदूंचे भवितव्य.
पवन कल्याणला असा ही प्रसाद
भाजपा उमेदवारांच्या प्रचारानिमित्त सुपर पॉवर स्टार पवन कल्याणचा रेकॉर्ड ब्रेक रोड शो झाला. पवन कल्याण यांनी विजयकुमार व सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. पण या दरम्यान विडी घरकुल परिसरात विघ्नसंतोषी मंडळींनी वीज प्रवाह बंद केला. रस्त्यावर अंधार केला. रोड शो मध्ये पवन कल्याणवर जोरदार पुष्पवृष्टी झाली.(काही घातपात असता तर) या विघ्नसंतोषी मंडळींनी घरकुल (कोटा)तून या पुष्पवृष्टीमध्ये बारीक खडी, गुळाचे खडे यांची पुरचंडी फेकत होते, अशी माहिती समोर आली आहे. पवन कल्याण यांच्या चेहर्यास त्यामुळे जखमा झाल्या. त्या दिवशी रात्री त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. पवन कल्याणचा रोड शो होवू नये, म्हणून देव पाण्यात ठेवले होते. तर माधवी लता यांनी जुन्या विडी घरकुल येथे सभा घेवू नये म्हणून केलेला प्रयत्न, तसेच तीनही मतदारसंघात त्यांनी रोड शो करू नये यासाठीचा खटाटोप, पाहता तुतारीचा व काम्युटरचा घातक डाव लक्षात आला तरी पुरे!
............
तरीही ते सेफ....
ते एकदम सेफ, पण... या लक्ष्यवेधनंतर शहराच्या प्रमुख पदाधिकार्याकडून नवीनच माहिती समोर आली. हे सेफ प्रदेश पदाधिकार्यांनी थेट प्रदेशातल्या आपल्या लाडक्या नेत्यांकडे रिपोर्ट केलाय. इथं सारं काही आलबेल आहे. कुणाचा कशात पायपोस नाही. आम्हालाही कुणी पुसत नाही. त्यामुळे कुठे तुतारी, कुठे काम्पुटरवर हात सर्व करत आहेत, म्हणे. मग असे थेट वरून (प्रदेश) नियुक्त झालेले नेते म्हणजे श्रेष्ठीच होय. त्यांना खऱं प्रदेश स्तरावर संपूर्ण राज्यात फिरवलं असतं तर. पक्षाचं भलं झालं असतं. म्हणजे इथं चांगभलं ला ब्रेक.. इतका उपद्व्याप करून, तरीही किती सेफ आहेत ना प्रदेश नियुक्त पदाधिक़ारी. यांना "भंडारा" लावणारा "नरेंद्र" भेटलाच पाहिजे.
.........................
What's Your Reaction?






