हिंदूंच्या अस्तित्वासाठी 100% टक्के मतदान करा : पू.स्वामी गोविंद देव गिरिजी

विश्व हिंदू परिषद धर्माचार्य चिंतन संमेलनात आवाहन

Oct 7, 2024 - 11:29
 0  633
हिंदूंच्या अस्तित्वासाठी 100% टक्के मतदान करा : पू.स्वामी गोविंद देव गिरिजी

 सोलापूर : धर्म म्हणजे कर्तव्य, देशात आपण टिकलं पाहिजे याकरिता, आपले कर्तव्य म्हणून धर्माच्या कामांसाठी सर्व हिंदू बांधव जर आपण यात थोडेही गाफील राहिलात, तर बांगलादेशात हिंदूंवर जे अत्याचार घडत आहे ते आपल्या घरापर्यंत यायला उशीर लागणार नाही. सर्वांनी स्वास्थ्य,सुरक्षितता व शांतता निर्माण होण्याकरिता पहिले धर्म म्हणून काम केले पाहिजे.

 आगामी काळात "जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा" याकरीता देशातील मंदिरे, गोमाता, देशाची सुरक्षितता व साधु संत महंत यांचे सर्व हिंदूनी रक्षण केले पाहिजे. त्यासाठी आपल्या विचारांचे सरकार असणे गरजेचे असल्याने, हिंदूंच्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्याकरीता, सर्वांनी सज्ज राहावे. यापुढची लढाई आंदोलनाची नसून येणाऱ्या निवडणुकीत हिंदू विचाराचे लोकप्रतिनिधी व आपल्या धर्माचे सरकार आणण्यासाठी एकजुटीने 100% टक्के मतदान करावे, असे आवाहन प.पू.स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांनी, उपस्थित संत, महंत, धर्माचार्य, शिवाचार्य हरिभक्त परायण महाराज यांना केले.  

विश्व हिंदू परिषदच्या षष्ठब्दीपूर्ती निमित्त सोलापुरात धर्माचार्य चिंतन संमेलन पार पडले. याप्रसंगी पूज्य गोविंद देवगिरी महाराज यांनी उपस्थितीत संत, महंत, धर्माचार्य, शिवाचार्य हरिभक्त परायण महाराज यांना मार्गदर्शन केले.

धर्माचार्य चिंतन संमेलनप्रसंगी व्यासपीठावर श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, निलकंठ हिरेमठ महास्वामी, राचोटेश्वर महास्वामी, शिवलिंगेश्वर महास्वामी, लक्ष्मण चव्हाण महाराज, सुधाकर इंगळे महाराज, मारुती तुणतुणे महाराज, संजय मुद्राळे, क्षेत्रीय धार्मिक पुंज प्रमुख, किशोर चव्हाण प्रांत मंत्री, जिल्हाध्यक्ष अभिमन्यू डोंगरे महाराज, नागनाथ बोंगरगे प्रांत धर्माचार्य संपर्क सहप्रमुख, ह.भ.प. शिवाजी मोरे, भागवत महाराज चवरे, शीख संप्रदायाचे रमेश सिंग, सिंधी संप्रदायाचे पंकज शर्मा, रा. स्व. संघाचे हेमंत हरहरे, मोची समाजाचे अविनाश सज्जन महाराज उपस्थित होते.

 सध्या आपल्या हिंदू धर्माबद्दल विरोधकांनी अपप्रचार सुरू केला असून त्यास आळा घालण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने जिल्हा "धर्माचार्य चिंतन संमेलने" आयोजित केली आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रिय धार्मिक पुंज प्रमुख संजय मुद्राळे यांनी दिली. 

सर्व हिंदू बांधवांनी आगामी निवडणुकीत लव्ह जिहादच्या विरोधात १००टक्के मतदान करावे, असे आवाहन विहिंप प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केले.

 सर्व धर्माचार्यांनी धर्मप्रसाराचे काम करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.

मागील लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या एका नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेला संपवायचे आहे असे म्हटल्याचे निदर्शनास आणून देत , श्रीकंंठ शिवाचार्य महास्वामी म्हणाले, वसुधैव कुटुंब पध्दतीने राहून सर्व कुटुंबातील सदस्यांवर संस्कार घडवावेत. याप्रसंगी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी, काशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे नियोजित धार्मिक कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र काशीपीठ येथे गेले असल्याने त्यांच्या आशीर्वाचनाचे 

 वाचन केले. हिंदू समाजाच्या पुनरूत्थानासाठी पंचपरिवर्तन १) समरसता, २) पर्यावरण, ३) कुटुंब प्रबोधन,४) नागरी शिष्टाचार, ५) स्वदेशी भाव हे नमूद करून सर्व जगात हिंदू धर्मच श्रेष्ठ आहे, असे काशी जगद्गुरु यांनी आशीर्वचनातून सांगितले.

किर्तनकार महाराजांनी, आपल्या कीर्तनातून सर्व हिंदू बांधवांनी हिंदूंच्या रक्षणार्थ आपल्या विचारांचे सरकार आणण्यासाठी बटन दाबून हिंदूंचे लोकप्रतिनिधी विजयी ह़ोण्याकरिता प्रयत्न करावा, असे आवाहन ह.भ.प.लक्ष्मण चव्हाण महाराज यांनी केले आहे.

प्रत्येक महाराजांनी तालुक्यातील पाच गावी किर्तने करुन धर्माचा प्रसार करावा, असे आवाहन

 मारुती तुणतुणे महाराज यांनी केले. हिंदू बांधवांनी प्रबोधन मंचच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत जागृतीचे काम करावे, असे मत हेमंत हरहरे यांनी व्यक्त केले.

आपण केलेल्या धर्माच्या कामावरून ओळखले जावे. याकरीता आपण 

धर्माच्या कामात सक्रिय व्हावे, असे आवाहन शिख समाजाचे धर्मगुरू रमेश सिंह यांनी केले. किर्तनात मोक्षावर बोलत असताना धर्मावर ही बोलत जावे, असे आवाहन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज- शिवाजी मोरे महाराज यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, परिचय व स्वागत विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी पुरुषोत्तम उडता, हितेश माधू अशोक पुजारी, विष्णू जगताप, बाबू गिरगल, जयदेव सुरवसे, रवी बोल्ली, चनबसव सोलापुरे,सिद्धेश्वर गोकावी, किशोर चांडोले, अविनाश माने, मनोज खलाटे यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow