भाजपा मंत्र्यांना बैठक़ीचे वावडे!
विखे पाटील, दादा पाटील, जयकुमार गोरे आणि आता बावनकुळे या मंत्र्यांना पक्षाच्या बैठक़ीचे वावडे असावे. ठरली बैठक़ तर ती उशीरा होणार सुरू, लागणार केवळ हजेरी, मग ती गुंडाळणार, निष्ठावान कार्यकर्त्यांचा हिरमोड.

(विजयकुमार पिसे)
पार्टी विथ डिफरन्स असा दावा नेहमी केला जातो. पण सत्तेच्या मकरात बसलेल्या भाजपाला सत्तेत आल्यानंतर संघटनेचे महत्व कमी वाटते, असा अनुभव येतोय. सोलापूरला नेहमीच बाहेरचा दिवा दिला (लादला) जातोय, याची खंत आहेच. विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, जयकुमार गोरे यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची धुरा दिली. पण ते संघटनेसाठी किती वेळ देतात? प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री गुरुवारी सोलापूर दौर्यावर आले. अध्यक्ष म्हणून त्यांचा कदाचित शेवटचा दौरा होता. म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. याचे समाधान निश्चित आहे. पण व्यस्त दौर्यामुळे हेरिटेज येथे दुपारची बैठक अनिश्चित झाली. ती पाच वाजता झाली. नूतन अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा पदभार घेतल्यानंतर पहिलाच कार्यक्रम व मोठी बैठक होती. उशीर झाल्यामुळे मी काही बोलणार नाही, निवेदन घेणार असे म्हणून निवेदने घेतली. बैठक असल्यामुळे अनेक पदाधिक़ारी व कार्यकर्त्यांनी निवेदन आणले नव्हते. म्हणजे बैठक़ीचा सोपस्कार पार पडला.
वास्तविक ही बैठक़ शिवस्मारकात ठरली होती. ती रद्द करून हेरिटेज तयारी केली. पण बावनकुळे महसूलमंत्री. खास राऊंड टेबल व्यवस्था. उपस्थित पदाधिकारी व दीडशे कार्यकर्त्यांचा परिचय. परंतु या सर्वांचा हिरमोड झाला. शिवाय काही प्रमुख जबाबदार कार्यकर्त्यांना निमंत्रणच नव्हते. गटबाजीतून डावलले गेले अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विखे आणि दादा पाटलांवर शाई टाकण्याचा प्रकार झाला. त्यामुळे खबरदारी म्हणून बैठका टाळल्या गेल्या. जयकुमार गोरे यांच्याकडून अजून कार्यकर्त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. दिवा बाहेरचा दिल्यामुळे कार्यकर्त्यांना उदासीनता अनुभवाला येते. विरोधात असताना नेते वेळ काढून आस्तपुस्त करायचे, सत्तेचा बाज सांभाळताना असे होणारच म्हणून घ्या.....
What's Your Reaction?






