प्रभाग 26 मध्ये चमत्कार घडवणार!
जनतेच्या मनातील नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा दावा
सोलापूर: नगरसेवकांची कामे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा महापालिका सदस्य म्हणून आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे, विकास कामाचा पाठपुरावा,रस्ते, पाणी,स्वच्छता,पथदिवे, ड्रेनेजची समस्यांचे निराकारण, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेकडील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा राबवून नागरिकांसाठी धावून जाणे हे माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी करून दाखवले आहे. म्हणूनच जनतेच्या मनातील नगरसेविका म्हणून ओळखतात व एक कॉल.. प्रॉब्लेम सॉल.. याची प्रचिती प्रत्यक्ष अनुभवली आहे.
कोरोना काळात लोक बाहेर पडत नव्हते परंतु नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण हे लोकांच्या मदतीला धावून गेलेले आहेत मास्क,सॅनिटायझर, व समक्ष उभे राहून निर्जंतुक फवारणी करून दिली. गरजूंना अन्नदान जसे की.. गहू,तांदूळ,तेल, चहापत्ती, साखर,साबण, याचे किट बनवून घरोघरी पोहोचवले. तसेच जुळे सोलापुरातील डॉ बगले यांच्या दवाखान्यात कोविड प्रतिबंधक लस केंद्र उभे केले. रेडमीसीअर इंजेक्शन उपलब्ध करून अनेकांचे प्राण वाचवले. हे सर्व सामान्य जनता विसरलेली नाही.विकास कामासाठी त्यांचा पाठपुरावा उल्लेखनीय. 2017 पासून नगरसेवक पदावर असताना त्यांनी अनेक नगरांचा कायापालट केला आहे. व कार्यकाल संपलेला असताना सुद्धा महानगरपालिका आयुक्त, यांना पत्रव्यवहार करून अनेक समस्या सोडवत आहेत. त्यामुळे जवळपास 250 नगरात त्यांच्याच नावाची चर्चा सध्या आहे.नगरसेवकाचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान आमदारांना दहा ते पंधरा वेळा विकासापासून वंचित नगरांचा विकासासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु जाणून बुजून व वाढलेली लोकप्रियता पाहून डावलण्यात आलेे, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे प्रभाग 26 मधील अनेक नगरे नाराज आहेत व नागरिकांच्या समस्यासाठी झटणार्या नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या पॅनलला निवडून देण्याचा निर्धार केलेला आहे. विशेष म्हणजे 2017 साली भाजपकडून प्रभाग क्रमांक 26 मध्ये त्यांना उमेदवारी दिली होती व त्या निवडूनही आल्या आहेत. व सातत्याने विकास कामे करून काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपमय केला आहे. भाजपनी त्यांना नाकारणे म्हणजे... स्वतःच्या पायावर... घेणे होय. हीच संधी साधून ज्येष्ठ समाजसेवक, माजी नगरसेवक तथा मजरेवाडीचे माजी सरपंच आप्पासाहेब हत्तुरे व राष्ट्रवादी अजित दादा गटाचे शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना प्रभाग 26 ची मोठी जबाबदारी दिली आहे, ती यशस्वी करून दाखवणार. विकासासाठी धडपडणारी जोडगोळी सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. जर त्यांचं पॅनलच निवडून आलं तर किती विकास होईल ह्याच उद्देशाने सर्व नगरातून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता विकासासाठी धडपडणार्यांच्या पाठीशी सामान्य जनता व सुज्ञ नागरिक आहेत. त्यामुळे प्रभाग 26 मध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे संपूर्ण पॅनल विजय करून चमत्कार करून दाखवणार.जनतेच्या हाकेला धावून येतोय हे महत्त्वाचं आहे.याचीच पावती म्हणून प्रभाग 26 मधील सर्व नागरिकांना नम्रतेने आवाहन आहे.येत्या 15 तारखेला भरघोस मतदान करून व 16 तारखेला संपूर्ण पॅनल निवडून दिल्याबद्दल गुलाल उधळायचा आहे व सर्वसामान्य जनता काय करू शकते हे दाखवून द्यायचे, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?