शिवसेनेची नेहमीची हाराकीरी शहर मध्यचा इतिहास
आता शिंदे सेना करणार काय?

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : शहर सध्या मतदार संघात हॅट्ट्रिक करून प्रणितीताई लोकसभेत पोहोचल्यामुळे विरोधकांच्या आशा बळावल्यात. परंतु गत तीन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची हाराकिरी काँग्रेसला फायदेशीर ठरली. त्यामुळे एमआयएमचा जोर वाढला आहे. आता शिंदे सेना नुरा कुस्ती करणार की भाजपाला जागा सोडणार इतकीच माफक अपेक्षा. अक्कलकोटचे प्रमोद ब्रह्मानंद मोरे यांचे अनपेक्षित नाव चर्चेत आल्यामुळे पुन्हा हाराकिरीची आठवण ताजी झाली आहे.
महाविकास आघाडीत उबाठा सेना सध्या कुठेच खिजगणतीत नाही. शिंदे सेनानै जोर लावला तरी खमक्या उमेदवार कोण हा कळीचा मुद्दा आहे. लोकसभा निवडणुकीत फक्त 894 मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळाल्यामुळे नैसर्गिकरित्या भाजपाची दावेदारी अधिकृत मानली जाते.
महायुतीमध्ये तुल्यबळ उमेदवार असेल तरच लढत निर्णायक होईल. 2009 मध्ये या मतदारसंघाचे परिसीमन झाले आणि शहर दक्षिण ऐवजी शहर मध्य असा विधानसभा मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासूनच म्हणजे २००९, २०१४आणि २०१९ या तीनही लढती काँग्रेसचे जिंकल्या. २००९मध्ये शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे तिसरा क्रमांकावर तर आडम मास्तर दुसऱ्या क्रमांकावर, २०१४ मध्ये शिवसेनेचे महेश कोठे होते त्यांनीही कच खाल्ली आणि तेही तिसऱ्या क्रमांकावर फेकले. २०१९ मध्ये शिवसेनेने आतबट्टाचा व्यवहार केला. कोठे ऐवजी दिलीप माने उमेदवार झाले. ते चौथ्या क्रमांकावर घसरले. या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आलीच नाही. ,म्हणजे हाराकिरी झाली. 2014 आणि 2019 मध्ये एमआयएम हाच प्रमुख चेहरा समोर आला. आणि हा पक्ष काँग्रेसचा मुकाबला करू शकतो ही प्रतिमा तयार झाली. त्यामुळे काँग्रेसचा फायदा होत गेला.
आता प्रणिती शिंदे यांच्या गैरहजेरीत हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष शिंदे सेना आणि भाजपा यांना निर्णायक संधी आहे. युवा नेते मनीष काळजे, ज्योती वाघमारे आणि माढ्याचे शिवाजी सावंत यांनी दावेदारी केली आहे. ही तीनही चेहरे प्रबळ आहेत का? आता चौथा उमेदवार म्हणून प्रमोद मोरे (अक्कलकोट कुरनूर) हा देखील बाहेरचा उमेदवार चर्चेत आहे.
या मतदार संघात पूर्व इतिहास शिवसेनेच फार चांगला नाही. त्यामुळे मतदारांना पर्याय शोधावा लागतो. तो प्रणिती यांच्यामध्ये दिसला. अचानकपणे युती तुटल्यामुळे भाजपाने 2014 मध्ये निवडणूक लढवली आणि 23 हजार मते घेतली. ही जागा लढवण्यासाठी महेश कोठेंनी सहा महिने आधी तयारी केली होती. शेवटच्या टप्प्यात कोठे यांचे अवसान संपले. त्यामुळे त्यांना(शिवसेना) तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. दुसरे क्रमांकाची मते एमआयएमल गली. 2019 मध्ये युती प्रबळ होती. परंतु शिवसेनेने उमेदवार बदलला. त्याचा बदला घेण्यासाठी महेश कोठे अपक्ष लढले. त्यामुळेचे शिवसेनेचे दिलीप माने चौथ्या क्रमांकावर घसरले. हा सारा घसरण्यचा खेळ पाहता शिवसेनेचे अस्तित्व किती? याचा अंदाज येतो. भाजपा ऐनवेळी मैदानात उतरून चांगली मते घेऊ शकतो हा अनुभव आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत युतीने व्यवहारिक विचार करून व शक्तिशाली उमेदवार ठरवून लढत दिली तरच भगवा फडकू शकेल. लढण्यासाठी निव्वळ देखावा, म्हणजे मतदारांची घोर फसवणूक.
२००९, १४आणि १९ या तीनही निवडणुकांंमध्ये शिवसेनेची घसरण म्हणजे शिवसेनेकडून काँग्रेसला गिफ्ट मिळाली असाच निष्कर्ष निघतो.
१९९५ मध्ये शिवसेनेचे शिवशरण पाटील आडम मास्तरांकडून दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन पराभूत झाले. मात्र १९९९ मध्ये त्यांनी त्याचा वचपआच काढला. प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे असे म्हटले तर मग २००४ मध्ये सनैचा उमेदवार नव्हता. काँग्रेसने ही जागा आडम यांना सोडली. यावेळी अपक्ष दिलीप माने रिंगणात होते. २०१९ मध्ये पुन्हा एकदा कौल घेतला. परंतु शिवसेनेतील बंडखोरी काँग्रेसच्या पथ्यावर पडली. कालचे शत्रू, आज मित्र असे दुर्दैवी शिवसेनेचे बरडे, दिलीप माने, महेश कोठे यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे या मंडळींना लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याची वेळ नव्हे नामुष्की ओढवली. आता विधानसभेसाठी या मंडळींपैकी कोठे आणि माने यांची मदार शिंदेंवर आहे.शिवसेना लढण्याच्या तयारीत असली तरी शिवाजी सावंत उपरा उमेदवार ठरतील, ज्योती वाघमारे या वर्षभरात शिंदे गटात गेल्या, ज्या प्रणिती शिंदे समर्थक व कांग्रेस महिला आघाडी अध्यक्ष होत्या. मनीष काळजे एकनाथ
शिंदे समर्थक आहेत, हा युवा चेहरा मतदारांना किती भुरळ पाडतो, त्याचे मुख्यमंत्र्यांनीच आकलन करून निर्णय घ्यावा. अन्यथा शिवसेनेचे यापूर्वीचे पराभूत उमेदवार, ज्यांच्यामुळे हा मतदार संघ काँग्रेसला गिफ्ट मिळाला. तीच री पुढे ओढली गेली तर मतदारांचा नाईलाज होईल. न पेक्षा महायुतीमध्ये ही जागा भाजपला सोडली तर कदाचित निर्णायक लढत होईल.
What's Your Reaction?






