दिल्लीत स्वा. सावरकरांचे चित्र! सावरकर राष्ट्रीय नायक
येत्या 28 तारखेला सावरकरांची 142 वी जयंती, म.दयानंद सरस्वती, पं.मदन मोहन मालवीय यांचाही सन्मान, दिल्ली विधानसभेचा ठराव, तब्बल 27 वर्षांनी बहुमान, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सत्तेत असताना स्वातंत्र्यवीरांची उपेक्षा, भाजपा सत्तेत आल्यानंतर बहुमान

(विजयकुमार पिसे)
तब्बल 27 वर्षांनी राजधानी नवी दिल्ली विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान होत आहे. येत्या 28 मे रोजी सावरकरांची 142 वी जयंती. या पार्श्वभूमीवर सावरकांचे चित्र विधानसभेत लावण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपा सरकारने दिल्लीत सत्ता प्रस्थापित केल्यानंतर विधानसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे एक भव्य छायाचित्र लावण्याचा ठराव पारित केला आहे. त्याचबरोबर महर्षी दयानंद सरस्वती आणि पं. मदन मोहन मालवीय यांची देखील चित्रे लावण्याचा ठराव आज झाला. सावरकर, म.दयानंद सरस्वती आणि पं.मदन मोहन मालवीय यांचे भारतीय इतिहासात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान उचित मानले जात आहे. कारण ते राष्ट्रीय नायक आहेत.
विधानसभाध्यक्ष विजेंदर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात, सामाजिक सुधारणांमध्ये आणि शैक्षणिक जागृतीमध्ये या महान व्यक्तिमत्त्वांच्या अद्वितीय योगदानाचा सन्मान करण्याच्या दिशेने हा निर्णय एक महत्त्वाचे पाऊल आहे. राष्ट्र उभारणी, सामाजिक जाणीव आणि शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात या तीन महापुरुषांनी मोठी भूमिका पार पाडली आहे.
विधानसभेच्या परिसरात त्यांचे छायाचित्र लावणे भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल आणि देशभक्ती, सेवा आणि लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देईल, असे ठरावात नमूद केले आहे.
अध्यक्ष गुप्ता म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यातील वीर सावरकरांचे योगदान देशभर आदराने लक्षात ठेवले जाते आणि विधानसभेच्या भित्तीचित्र परंपरेत त्यांचा समावेश करणे सर्वात योग्य आणि अभिमानास्पद ठरेल. दिल्ली विधानसभा देशातील महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती अबाधित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. दिल्लीचा हा निर्णय केवळ या 3 राष्ट्रीय नायकांना श्रद्धांजली नाही, तर नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सांस्कृतिक जाणीव आणि लोकशाही जबाबदारीची भावना देखील बळकट करणार आहे.
भारतरत्न पुरस्काराची प्रतीक्षा
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या महान कार्याबाबत काँग्रेसने नेहमीच उपेक्षेने आणि चेष्टेने त्यांना अपमानित केले आहे. राहुल गांधी याबाबत दुराग्रही आहेत. दरम्यान सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराचा सर्वोच्च बहुमान कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा आहे. मोदी सरकारच ही अपेक्षापूर्ती करतील असाही विश्वास आहे.
What's Your Reaction?






