स्वावलंबी भारत अभियान आणि उद्यम फाउंडेशन, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यात सामंजस्य करार.*
कौशल्य आधारित, आत्मनिर्भर सोलापूर बनविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल.

1.
देशभरात नवं उद्योजक घडविणे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास व्हावे याकरिता स्वावलंबी भारत अभियान कार्यरत आहे. स्वावलंबी भारत अभियान तर्फे सोलापूर मध्ये ही अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे सोलापूर विद्यापीठ सोबत झालेले उद्योजकता विकास यात्रा. या यात्रेतून 11 तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. मा. कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या उद्यम इनक्युबेशन सेंटर आणि स्वावलंबी भारत अभियान च्या माध्यमातून पुढेही अनेक उपक्रम करण्यात येतील ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पना ऐकून व्हॅलिडेट करण्यापासून मार्केटिंग, हॅन्ड होल्डिंग सपोर्ट दोघांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता आज दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. स्वावलंबी भारत अभियान चे जिल्हा समन्वयक विनायक बंकापूर आणि उद्यम फाउंडेशन तर्फे डॉ. राजेश गूरानी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र कुलगुरू डॉ दामा सरांनी शुभेच्छा दिल्या तसेच स्वावलंबी भारत अभियानाचे विभाग समन्वयक आणि विद्यापीठाचे अधिसभा सदस्य चन्नवीर बंकुर, सह समन्वयक मयंक चौहान, प्रकल्प अधिकारी श्रीनाथ गायकवाड, उद्यम चे व्यवस्थापक श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
What's Your Reaction?






