विश्व हिंदू परिषदेचा समरसता यज्ञ
अयोध्या श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्त उपक्रम

सोलापूर : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पूर्व विभाग राम मंदिरात अयोध्या जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीचा सोहळा समरसता महायज्ञ उत्साहात संपन्न झाला.
पूर्व विभाग राम मंदिर, दाजी पेठ येथे आयोजित "समरसता महायज्ञ" अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या पवित्र प्रसंगी सहा श्रद्धावान यजमान महायज्ञात सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक धार्मिक विधींमधून आध्यात्मिक ऊर्जा उपस्थित रामभक्तांनी अनुभवली.
कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय समरसता प्रमुख नरेशजी पाटील (मुंबई) यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मनोगतामधून उपस्थित स्वयंसेवक आणि भक्तगण यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, जिल्हा सह मंत्री बाबू गिरगल, विभाग सहमंत्री पत्रकार विजयकुमार पिसे, बजरंग दल जिल्हा संयोजक सिद्धाराम चरकुपल्ली, विभाग संपर्क प्रमुख पुरुषोत्तम उडता, जिल्हा संपर्क प्रमुख प्रविण जिल्ला, जिल्हा समरसता प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी कासेगावकर, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख रवि बोल्ली, सिद्धेश्वर गोकावी आदि विहिंप प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
धार्मिक विधींचे नेतृत्व मुख्य पुरोहित वेणुगोपाल मालपुरि व यांच्यासह पुरोहित संघाने केले. मल्लेश परुते, श्रीनिवास पल्लोलु, रामचंद्र सुळगांवकर, देविदास वंगा आणि अंबादास कोमाकुल यांनी समरसता यज्ञकार्य पार पाडले. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष योगदान
पूर्व विभाग राम मंदिर अध्यक्ष भूपती सामलेटी आणि विश्वस्त मंडळातील अमित श्रीराम, दत्तात्रय श्रीराम, मिरजकर व दयानंद कोंडाबत्तिन व सर्व पदाधिकारी यांचे योगदान लाभले.
या पवित्र सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी यजमान जोडप्यांचे, मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे व स्वयंसेवकांचे आभार चंद्रकांत कुलकर्णी यांनी मानले.
What's Your Reaction?






