एमआयडीसीतील भीषण दुर्घटनेबद्दल मोदी, फडणवीस यांना शोक आर्थिक मदत जाहीर

एमआयडीसीतील भीषण दुर्घटनेबद्दल मोदी, फडणवीस यांना शोक आर्थिक मदत जाहीर

May 19, 2025 - 17:27
 0  62
एमआयडीसीतील भीषण दुर्घटनेबद्दल मोदी, फडणवीस यांना शोक आर्थिक मदत जाहीर

  दुर्घटनेतील आठ मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पीएमएनआरएफ मधून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत, मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले. दरम्यान ही आग कशामुळे लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे. 

     सोलापूर एमआयडीसीत एका टेक्स्टाईल युनिटमध्ये आग लागून दुर्दैवी घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. घटनेबद्दल ऐकून माझे मन व्यथित झाले, असे म्हणत पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.

      सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागांमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे आग लागली होती. यात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मी व्यथित आहे. ज्यांनी या घटनेत आपल्या प्रियजणांना गमावले, त्यांच्या प्रति मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो. पीएमएनआरएफ मधून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत करण्यात येईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.  

    रविवारी झालेल्या दुर्घटनेमुळे सोलापूरकर सुन्न झाले असून मृतांच्या कुटुंबियांबद्दल राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान टॉवेल कारखान्याला आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. 

*एकनाथ शिंदेंकडूनही मदतीचे निर्देश*

    या अग्नीतांडवात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. तात्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन लावून घडलेल्या घटनेची चौकशी केली आणि आर्थिक मदत करण्यास सांगितले.

      

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow