गोवंश तस्करी; 8 जणांची टोळी तडीपार! विहिंप बजरंग गोरक्षा विभागाच्या पाठपुराव्याला यश
गोवंश हत्येस बंदी, तरीही तस्करी व कत्तली करणार्या टोळीने हैदोस घातला होता, त्यांना तडीपार केले असून अशी कारवाईची घटना प्रथमच घडली आहे. ज्यामुळे अशा घटनांना पायबंद बसू शकेल. पोलिसांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले जात आहे. विहिंप बजरंग दल गोरक्षा विभागाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

(विजयकुमार पिसे)
वारंवार कत्तलीसाठी तस्करी करणार्या 8 सराईत गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दोन वर्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. गोवंश तस्करी व कत्तली करणार्या टोळीवर अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच हद्दपारची कारवाई झाली असावी. नेवासा पोलिसांनी 8 जणांना दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
गोवंश हत्येस बंदी असूनही वारंवार कत्तलीसाठी तस्करी करणार्या 8 सराईत गुन्हेगारांचा अहिल्यानगर जिल्ह्यात धुमाकूळ सुरू होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दोन वर्षांसाठी जिल्हा तडीपारीचे आदेश काढले आहेत. या घटनेने गोवंश तस्करांत खळबळ माजली आहे. पोलिसांनी नेवासे येथील नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, अबू शाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी, अकील जाफर चौधरी (सर्व रा. नायकवाडी मोहल्ला, नेवासे) यांच्यावर तडीपारीची कठोर कारवाई केली आहे.
नेवासा परिसरात बेकायदा गोवंशाची तस्करी करणारी टोळी कार्यरत असून जनावरांना अमानुषपणे डांबून ठेवणे, भरधाव वाहनातून तस्करी करणे, धार्मिक भावना दुखावणे, यासारखे गंभीर गुन्हे या या आठ जणांच्या टोळीवर दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही अनेकदा छापे टाकून या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र अधूनमधून ही टोळी डोके वर काढत होती. त्यामुळे नेवासा पोलिसांनी त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी त्यांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर हद्दपारीचे आदेश बजावले. आता त्यांना परतीसाठी पोलिसांची लेखी परवानगी आवश्यक आहे. तसेच पोलीस ठाण्यात हजेरी अनिवार्य आहे. अशा सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएसारखी कठोर कायदेशीर अटळ असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक जरे, अंमलदार राम माळी, महिला पोलीस अंमलदार वर्षा गरड यांनी याप्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांची अशी कारवाई प्रथमच झाल्याबद्दल गोवंश संरक्षकांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?






