...तर बांगला देशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती
मारकडवाडीत बॅलेटवॉर; इव्हीएमवरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकार्यांनी वेधले गंभीर लक्ष

सोलापूर : इव्हीएमवरून महाराष्ट्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होत आहे, अशी शंका उपस्थित होत असून तसेच हा विद्रोह तर नाही ना? याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी तातडीची पत्र परिषद घेवून इव्हीएम मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची तपशीलाने माहिती विषद केली. यावेळी त्यांनी पत्रक़ारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, बांगला देशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती, याकडे त्यांनी गंभीरपणे लक्ष वेधले. त्यामुळे मारकडवाडी हे केवळ निमित्त आहे. विरोधकांचा हेतू कदाचित वेगळा असू शकते. यास पुष्टी मिळत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी रविवारी मारकडवाडीत जाऊन आपली भूमिका मांडली. तेव्हा तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे आणि अजीत पवार यांनी शरद पवार यांचा मुद्दा खोडून काढला. पराभव स्वीकारा, संभ्रम निर्माण करू नका, असे आवाहन केले.
रविवारी सोलापुरात याविषयी पत्रकार परिषद झाली. तेव्हा माध्यमकर्मीनी इव्हीएमविषयी अविश्वास निर्माण होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी सर्वप्रथम या शंकेचे निरसन केले. इव्हीएमपारदर्शी आहे. निवडणूक़ मतदान प्रक्रिया राबविण्याचा अधिकार फक्त निवडणूक़ आयोगाला आहे. त्यामध्ये कुणाला हस्तक्षेप करता येत नाही. पण असा अविश्वास निर्माण केला गेला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी, बांगला देशात घडलेल्या ताज्या घटनेचे उदाहरण दिले. मारकडवाडीत काही मंडळींची बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका पूर्णत: बेकायदा आहे. यातून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने झाली. तेव्हा एक़ाही संबंधित प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. आता आक्षेप घेण्याच्या भूमिकेने आविश्वासाचे वातावरण निर्माण केले जात आहे. पुरावे न देताच आक्षेप घेणे चुकीचे असून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिक़ारी आशीर्वाद म्हणाले. तसेच निवडणूक यंत्रणा व इव्हीएमविषयी संभ्रम निर्माण केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






